Leprosy
Leprosy 
पश्चिम महाराष्ट्र

कुष्ठरोगाचे ग्रहण ६४ वर्षांनंतरही सुटेना

तात्या लांडगे

राज्यात दर वर्षी सापडतात ११ हजार कुष्ठरोगी 
सोलापूर - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम सुरू असून, २०२५ पर्यंत राज्यातील कुष्ठरोग हद्दपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, नागपूर, ठाणे, रायगड, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमधील कुष्ठरोगाचे ग्रहण ६४ वर्षांपासून सुटले नाही. कुष्ठरोग नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तब्बल आठ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही १४ वर्षांपासून राज्यात दर वर्षी सुमारे ११ हजार कुष्ठरोगी आढळतातच, अशी माहिती राज्याच्या कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन विभागातील सूत्रांनी दिली. 

राज्यात १९५५ मध्ये कुष्ठरोग्यांची मोठी संख्या होती, परंतु १९७८ पासून त्यामध्ये घट झाली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सर्वोपचार रुग्णालयांची निर्मिती झाल्याने उपचाराची सोय झाली. ग्रामीण भागातील प्रत्येक घरोघरी, तर शहरातील झोपडपट्टी व हद्दवाढ भागातून कुष्ठरोग्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, २००५ मध्ये कुष्ठरोग निर्मूलन विभाग बरखास्त केल्याने मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यामुळे ‘आशा’ कार्यकर्त्या, ‘एनएचएम’सह अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्‍त कामे करून घ्यावी लागत असल्याने अद्याप सर्व कुष्ठरोग्यांपर्यंत पोचता आले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कुष्ठरोग्यांच्या शोध मोहिमेसाठी दर वर्षी केंद्र व राज्य सरकारकडून सरासरी ३५ कोटींपर्यंत खर्च होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT