Farmer
Farmer 
पश्चिम महाराष्ट्र

दोन हजार कोटींचे व्याज द्या

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, कर्जमाफीला विलंब व काही शेतकऱ्यांची रक्‍कम मिळाली नसल्याने बॅंकांना आतापर्यंत तब्बल एक हजार ८६० कोटी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे. व्याजाची रक्‍कम द्यावी, अशी मागणी हतबल जिल्हा बॅंकांनी सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, सरकारने यावर काहीच उत्तर मिळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा बॅंकेला आतापर्यंत ४८१ कोटी रुपये मिळाले आहेत. दीड लाखापेक्षा कमी आणि त्याहून अधिक थकबाकी असलेल्या सुमारे १७ हजार खातेदारांची रक्‍कम येणे बाकी आहे. दोन वर्षांपासून कर्जमाफीची रक्‍कम टप्प्याटप्प्याने बॅंकेला मिळत असल्याने बॅंकेला आतापर्यंत तब्बल ८२ कोटी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे. कर्जमाफीच्या विलंबामुळे बॅंकांना शेती कर्जवाटपात अडचणी निर्माण झाल्या असून बॅंकेच्या अनेक शाखा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ही रक्‍कम सरकारने तत्काळ द्यावी, अन्यथा बॅंकांचा एनपीए वाढेल, अशी भीती सोलापूर, नाशिक, बीड, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह अन्य जिल्हा बॅंकांनी सरकारकडे व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्यांसाठी सरकारने एकरकमी परतफेड योजना सुरू केली; परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी दीड लाखावरील रक्‍कम भरलेली नाही. त्याची मुदत ३१ मार्चपर्यंतच असून संबंधितांनी उर्वरित रक्‍कम न भरल्यास ती परत जाईल. कर्जमाफीची रक्‍कम टप्प्याटप्प्यात मिळाल्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांना मोठ्या प्रमाणावर व्याजाचा भुर्दंड सोसावा लागला आहे.
- अशोक कांबळे, विभागीय व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया, सोलापूर

राज्याची स्थिती
५९.७३ लाख एकूण अर्जदार शेतकरी
४३.१२ लाख रुपये कर्जमाफी मिळालेले शेतकरी
१८,१२५ कोटी रुपये मिळालेली रक्‍कम
१,८६० कोटी रुपये प्रलंबित व्याजाची रक्‍कम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT