पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : काटा मारण्यासोबत जाणाऱ्यांचा काटा काढू

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला टोला लगावला. 

श्री खोत म्हणाले, ‘‘साखरेची आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे काम मोंदी सरकारने केले. २९०० रुपयांवरून ३१०० पर्यंत दर केला. ज्या काटा मारणाऱ्यां साखरदारांवर टिका करत होता. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला आहात. कारखानदार काटा मारतात असे आपण म्हणत होता. आता आपला काटा काढल्याशिवाय आम्ही स्वत: बसणार नाही.’ 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या. चार जागांच्या आधारे शरद पवार दिल्लीत राजकारण करतात. यानंतर एकही जागा युतीशिवाय कोणालाही मिळणार नाही. शरद पवारांनी स्वत: पळ काढला आणि मुलीला आणि नातवाला संकटात ढकलले आहे. अजूनही फॉर्म भरायचा आहे.  नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांनीही आपल्या पत्नीला पुढे केले आहे. सर्वसाधारणपणे पत्नीच्या मागे नवरा उभा राहतो. याठिकाणी पत्नीला खड्ड्यात टाकून आपण विधानसभेला थांबतो म्हणून सांगून अशोकराव चव्हाण यांनी माघार घेतली. येवढी भिती निर्माण झाली आहे. ही भिती अशा संभांमधून अधिक जास्त जाणवणार असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितेल. 

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्रातून युतीचे ४८ खासदार विजयी होतील. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, कोल्हापूर लोकसभामधून एक लाखांचे मताध्यक्‍य संजय मंडलिक यांना देवू.,

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, राज्यात ४८ विरूध्द ० अशीही लढाई आहे. भाजप सरकारने अनेक योजना राबवल्या आणि त्या प्रत्यक्षातही आणल्या आहेत. गेल्या निवडणूकीत दिलेला प्रत्यक शब्द पाळला आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व खासदार हे युतीचे असतील. यामध्ये कोणाच्याही मनात तिळमात्र शंका राहिलेली नाही.’

आमदार चंद्रदिप नरके म्हणाले, शिवसेना-भाजप युती म्हणजे जातीय वादी पक्ष म्हणून बघणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला आजची सभा चपराक आहे. युतीची सत्ता आल्यानंतर अनेक निर्णय चांगले झाले. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे.  

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘ही महासभा म्हणजे विरोधकांना भिम टोला आहे. आम्हाला निवडूण देण्याचा निर्धार आम जनतेनेच केला आहे. कोल्हापूरात आयटी क्षेत्र, क्रीडा संकूल, कोल्हापूर चप्पल तसेच गुळाचा ब्रॅंड विकसित करणे, महिलांच्या विविध बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्याचे व्हिजन आहे. भूमिपुत्र विरूध्द बाहेरचे अशीही लढाई आहे.’ 

धैर्यशील माने म्हणाले, पंचगंगेला पावसाळ्यात महापुर येतो, पण यावेळी उन्हाळ्यात माणसांचा महापुर आलेला आहे. कोणाच्या रिकाम्या हातात दगड देण्यापेक्षा मी रोजगार देणे पसंद करतो. मला बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब माने यांचा आर्शिवाद आहे.’ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT