NCP-BJP-Shivsena
NCP-BJP-Shivsena 
पश्चिम महाराष्ट्र

संभाव्य ‘आयारामां’मुळे भाजप अस्वस्थ!

प्रवीण जाधव

सातारा - राष्ट्रवादीअंतर्गत धुसफुशीतून पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी या चर्चांमुळे मात्र भारतीय जनता पक्षात अस्वस्थता पसरली आहे. संभाव्य आयारामांमुळे आपली तर गोची होणार नाही ना, अशी धाकधूक भाजपचे नेते व पदाधिकाऱ्यांना भेडसावत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकसंधपणे निवडणुकीला सामोरी जाणारी राष्ट्रवादी दिसली; परंतु एक महिना उलटायच्या आतच लोकसभेपूर्वीचे वातावरण जिल्ह्यात पुन्हा निर्माण झाले आहे. खासदार उदयनराजेंनी आपल्या मूळ पदावर येत पुन्हा प्रश्‍नांच्या माध्यमातून विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर आरोपाला सुरवात केली. त्या आरोपांना प्रत्युत्तर होऊ लागल्याने राष्ट्रवादीअंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

विकासकामांवर चर्चा करण्याऐवजी ते आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते पुन्हा आरोप-प्रत्यारोपांतच गुंतल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यातील नागरिकांना हे आशादायक चित्र वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. संपूर्ण राज्यभर पक्ष मोठ्या संघर्षाला सामोरे जात असताना बालेकिल्ल्यातील ही तऱ्हा कार्यकर्त्यांना रूचेना झाली आहे. आरोप- प्रत्यारोपांची पातळीही आता बदलत चालली आहे. आतापर्यंत एकमेकांवर आरोप होत होते; परंतु पक्ष सोडून जाण्याची भाषा कोणी करत नव्हते. रामराजे नाईक- निंबाळकर यांनीही खासदारांना आवरा नाही तर आम्हाला बाहेर पडण्याची परवानगी द्या, असे पवारांना सांगणार असल्याचे म्हटले, तर शिवेंद्रसिंहराजे यांनीही पहिल्यांदाच वेळ आल्यावर विचार करू, असे म्हणत पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला.

जिल्ह्याच्या राजकरणाची धुरा सांभाळणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांनी असे म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच त्यांचे आधीच ठरले आहे, माझे कारण पुढे करू नका, असे म्हणत पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली. प्रत्यक्षात या गोष्टीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, त्यामुळे जिल्ह्यात रामराजे व शिवेंद्रसिंहराजे पक्ष सोडणार या चर्चांना ऊत आला आहे. त्यातून राजकारणाच्या सारीपाटावर कसे फासे पडणार याचेही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

या सर्व प्रकारांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे; परंतु त्यापेक्षाही मोठी अस्वस्था भाजपच्या गोटात पसरलेली आहे. भाजपच्या गोटात असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते कधी काळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे होते. सध्या राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये असलेल्यांच्या राजकीय वर्चस्वामुळेच त्यातील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये गेलेले आहेत. कधी नव्हे ते त्यांना सत्तेची फळे चाखता येत आहेत. सत्ताधारी म्हणून समाजात वावरता येत आहे. सध्याच्या वर्चस्ववाद्यांशी झगडूनच त्यांनी हे मिळवेल आहे; परंतु ज्यांच्याशी झगडलो तचे आता पक्षात येत असतील तर काय असा प्रश्‍न पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे. आयारामांमुळे आपल्याला डावलले जाईल, त्यांच्याच कार्यकर्त्यांचा झेंडा नाचणार या भीतीने निष्ठावंतांच्या पोटात भीतीचा गोळा येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT