पश्चिम महाराष्ट्र

किल्लेमच्छिंद्रगडला मळी मिश्रीत पाणी

सकाळवृत्तसेवा

किल्लेमच्छिंद्रगड - शेणखतास पर्यायी खत म्हणून शेतीत वापरल्या जाणाऱ्या मळी मिश्रीत पाण्यामुळे किल्लेमच्छिंद्रगड परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे वाडीवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरुपी दुर्भिक्ष तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

शेणखताची  मागणीपेक्षा उपलब्धता कमी असलेने तसेच शेतीची उत्पादन क्षमता वाढून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी साखर कारखान्यातून बाहेर पडणारे मळीमिश्रीत पाणी शेतात शेणखतास पर्याय म्हणून शेतकरी वापर करीत आहेत. त्यामुळे जरी या मळीमिश्रीत पाण्यापासुन शेतपिकाच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी हेच पाणी शेत जमिनीत जिरुन त्याचा पाझर परीसरातील विहीरी, बोअरवेल मध्ये लागुन पिण्यायोग्य असलेले पाणी मळीमिश्रीत झाले आहे.

याच दुषित पाण्याने किल्लेमच्छिंद्रगड, येडेमच्छिंद्र, बिचुद, भवानीनगर, बेरडमाची, नरसिंहपूर, लवणमाची, रेठरेहरणाक्ष या गावातील वाडीवस्तीवर राहाणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कायमस्वरुपी संकट तयार झाले आहे. दूषित आणि मळीमिश्रीत पाण्याचा पशुधनासही पिण्यासाठी उपयोग होत नसलेने एरव्ही शेतात असणारे पशुधन गोठे रिकामे झाले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT