Revenue Minister criticizes central government
Revenue Minister criticizes central government 
पश्चिम महाराष्ट्र

आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरविण्याचा डाव, महसूलमंत्र्यांना संशय

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः ""एल्गार परिषदेचा तपास "एनआयए' संस्थेकडे देण्याची घाई पाहता, पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे दिसते,'' असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

साहित्यिक नक्षलवादी कसे 
पत्रकारांशी बोलताना मंत्री थोरात म्हणाले, ""कवी, साहित्यिक, विचारवंतांसाठी पुरोगामी विचारांचे व्यासपीठ असलेल्या एल्गार परिषदेत अनेक जण विचार मांडतात. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे.

विचार दाबण्याचा प्रयत्न

हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. याबाबत कोणी केलेली आगळीक किंवा त्यांच्या विरोधात काही पुरावे असल्यास आम्ही त्यांचे समर्थन करणार नाही. मात्र, एकूणच ज्या प्रकारे घाईगडबडीत हा तपास केंद्रीय संस्थेकडे दिला, त्याची वेळ-काळ पाहता, यात काही तरी काळे-बेरे असल्याचा संशय येतो.'' 

विचारवंतांना संपवण्याचा डाव

""पुरोगामी विचारांच्या दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणाऱ्या एल्गार परिषदेवर कारवाई करून त्या विचारांना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत देशभरातून चिंता व्यक्त होत आहे,'' असे थोरात यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT