पश्चिम महाराष्ट्र

शेतमालाला दर मिळावा यासाठी शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

विजय पाटील

सांगली - जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संप आणखीन तीव्र झाला आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

दूध, ऊस, डाळिंब, भाजीपाला रस्त्यावर आेतून कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे राज्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे.  दूध, साखर तसेच तुरीला योग्य भाव मिळत नसल्याने सांगली जिल्ह्याचा शेतकरी आता आक्रमक झाला आहे.

दीड एकरवर मी वांगी लागवड केली आहे. पण या वांग्यास पाच रुपये दर आहे. तोडणीचाही खर्च निघत नाही. यासाठी शेतमालास उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल असा भाव द्यावा अशी आमची मागणी आहे
- सुदर्शन देर्डे,
आंदोलक शेतकरी

अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने हे आंदोलन केले आहे. भाजीपाला उत्स्फुर्तपणे रस्त्यावर टाकला आहे. भाजीपाल्यास पन्नास टक्के नफा स्वामिनाथन आयोगानुसार मिळायला हवा. आम्हाला प्रतिसरकार आणायची वेळ आणू नका, अशी आमची मागणी नाही. शेतकऱ्यांना भाव द्यायचा की नाही हे अद्याप सरकारचे धोरण ठरलेले नाही. शेतकऱ्याला कुजवत ठेवण्याचे काम हे सरकार करत आहे. 
- नारायण चौगुले,
आंदोलक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT