पश्चिम महाराष्ट्र

महापरिवर्तनाची सुरुवात सांगलीतून करा - धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

सांगली - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेची चार वर्षांत सर्व बाबतीत फसवणूक केली आहे. तरुण, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, शेतमजूर सर्वांच्याच मनात सरकारबद्दल संताप आहे. हा राग महापालिका निवडणुकीत मतपेटीतून व्यक्त करा आणि महापरिवर्तनाची सुरुवात सांगलीतून करा, असे आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार आज मुंडे यांच्या हस्ते झाला. 

शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टेशन चौकात झालेल्या कार्यक्रमात श्री. मुंडे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला आणि ज्या वेळी सांगलीकडे राज्याचे नेतृत्व आले आहे, तेव्हा राज्यात सत्ता परिवर्तन झाले आहे, हीच परंपरा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीही सुरू राहणार असून, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी सत्तेत येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार श्रीमती सुमन पाटील उपस्थित होत्या. 

मुंडे म्हणाले, ‘‘शेतकरी, शेतमजूर सामान्यांचा लढा राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेतून लढला. अच्छे दिन, महागाई कमी करण्याच्या नावावर जनतेला फसवले. मांसबंदी, नोटबंदी केली, मात्र आता चुकलो तर मोदीबाबा नसबंदी केल्याशिवाय राहणार नाहीत. महागाई चारपटीने वाढली, रोजगार नाहीत त्यामुळे तरुणाई संतापली आहे. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत समाजाची फसवणूक केली आहे. महिला, मुली सुरक्षित नाहीत याचा राग असेल, संताप असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT