State-Government
State-Government 
पश्चिम महाराष्ट्र

‘आमदार आदर्श ग्राम’ला २५ लाख निधी

सकाळवृत्तसेवा

सातारा - केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरू केलेल्या आमदार आदर्श ग्राम योजनेला जिल्ह्यातील आमदारांनी कृतीयुक्‍त पाठिंबा दर्शवत गावे निवडली; परंतु त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याने उदासीनतेच्या गर्तेत ही योजना अडकली होती. आता मात्र राज्य सरकारने या योजनेसाठी २५ लाखांपर्यंत निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेला शेवटच्या टप्प्यात का होईना, गती मिळणे अपेक्षित आहे. 

राज्य विधीमंडळ सदस्यांनी २०१९ पर्यंत आपल्या मतदारसंघातील तीन गावे आमदार आदर्श ग्राम योजनेतून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१५ मध्ये घेतला होता. या गावांच्या विकासाला आतापर्यंत फक्त आमदार निधीच देण्याची तरतूद होती. त्यामुळे या गावांवर जास्त निधी खर्च केला तर इतर गावांना निधी देता येणार नाही. 

त्यामुळे बेरजेचे राजकारण करताना आमदारांना या योजनेकडे सोयीस्करपणे पाठ फिरवली होती. त्यातच जिल्ह्यात आमदार शंभूराज देसाई वगळता सर्व आमदार विरोधी बाकावरील असल्याने त्यांच्याकडूनही या योजनेला अपेक्षित गती नव्हती. जिल्ह्याबाहेरील आमदारांनीही अनेक गावे दत्तक घेतली असली, तरी शासकीय योजना राबविण्याशिवाय मोठी कामे झालेली नाहीत.  त्यामुळे या योजनेला गती मिळावी, यासाठी आता आमदार निधीला शासनाचा जोड निधी देण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे या योजनेतील गावांना आता जास्तीतजास्त २५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. जिल्ह्यात ३८ गावांची निवड विविध आमदारांनी ‘आमदार आदर्श ग्राम योजने’त केली आहे. ग्राम विकास आराखड्यातून आमदारांनी निधी दिला असल्यास त्या गावांना आता शासनाच्या निधीची जोड मिळणार आहे. 

गावांच्या विकासासाठी आमदार निधीतून ६० टक्के निधी व शासनाकडून ४० टक्के निधी देण्याचे प्रमाण ग्रामविकास विभागाने निश्‍चित केले आहे. ४० टक्‍क्‍यांचा निधी देताना जास्तीतजास्त २५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून देण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. ४० टक्के अथवा २५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम गावाच्या विकासाला मिळणार आहे. त्यामुळे या गावांचे रुपडे बदलेले अशी अपेक्षा लोकांना निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT