Subhash-Deshmukh
Subhash-Deshmukh 
पश्चिम महाराष्ट्र

शेतमाल तारण योजनेतून 22 कोटींचे वाटप - देशमुख

सकाळवृत्तसेवा

सोलापूर - राज्यात शेतमाल तारण योजनेमध्ये 307 बाजार समित्यांपैकी केवळ 121 बाजार समित्यांनी सहभाग घेतला आहे. या बाजार समित्यांच्या माध्यमातून तीन हजार 144 शेतकऱ्यांचा एक लाख 21 हजार 403 क्विंटल माल तारण ठेवला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना 22 कोटी 95 लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

राज्यात पुढील वर्षापासून गावातील विकास सोसायट्यांमार्फत पणन महामंडळ शेतमाल तारण योजना राबविण्यावर भर देणार आहे. त्यासाठी ज्या सोसायट्यांना गोडाऊनची गरज आहे, त्या सोसायट्यांनी गोडाऊन बांधण्यासाठी पणन महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहनही सहकार व पणनमंत्री देशमुख यांनी केले. त्यासाठी पणन महामंडळ सोसायट्यांना मदत करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नेरपिंगळा (जिल्हा अमरावती) या गावातील विकास सोसायटीने 20 हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. जे बाजार समित्यांना शक्‍य झाले नाही ते एका गावातील विकास सोसायटीने शक्‍य करून दाखविले आहे. गावातील विकास सोसायट्यांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

कर्जमाफीचा विषय गुरुवारपर्यंत संपवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा पहिला टप्पा गुरुवारपर्यंत (ता. 15) पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कामकाज सुरू केले आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर नव्याने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT