Solapur Railway Station 
सोलापूर

रिझर्व्हेशन कन्फर्म झाल्यावरच मिळेल रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश ! रिझर्व्हेशनशिवाय प्रवास नाहीच 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचे संकट अद्यापही दूर न झाल्याने रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्ववत झालेली नाही. स्थानकांवरील गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही, याची खबरदारी घेत प्रशासनाने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आरक्षित तिकिटाची अट घातली. जनरल तिकिटे बंद केल्यानंतर आता आरक्षित तिकिट कन्फर्म झाल्याशिवाय संबंधित प्रवाशाला स्थानकावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

सोलापूर विभागातून दररोज 35 रेल्वे गाड्या धावत आहेत. दररोज सरासरी चार हजारांपर्यंत प्रवासी सोलापूर स्थानकावरून देशभर प्रवास करतात. प्रवाशांसोबत येणाऱ्या नातेवाइकांनाही स्थानकाबाहेरच अडविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर आरक्षण कन्फर्म झालेला प्रवासी स्थानकावर आल्यानंतर त्यांचे थर्मल स्क्रिनिंग करून त्याच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. एखाद्या प्रवाशाचे तापमान 98 हून अधिक असल्यास त्याला काहीवेळ स्थानकावरील प्रतीक्षालयात थांबवून ठेवले जाते. काही वेळाने त्याची तपासणी करून रेल्वेत बसण्याची परवानगी दिली जात आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस वितरित झाल्यानंतर नववर्षात रेल्वे वाहतूक टप्प्या-टप्प्याने पूर्ववत होईल, असा विश्‍वास रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व्यक्‍त करीत आहेत. 

प्रवाशांसाठी आरक्षित तिकिटाची सोय स्थानकावर 
कोरोनामुळे काही मोजक्‍याच रेल्वे गाड्या विविध मार्गांवरून धावत आहेत. प्रवाशांसाठी आरक्षित तिकिटाची सोय स्थानकावरही करण्यात आली आहे. तिकीट नसलेल्यांना अथवा काढलेले आरक्षित तिकीट कन्फर्म न झालेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश दिला जात नाही. 
- प्रदीप हिरडे,
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 

अनावश्‍यक थांबे कमी करून गाड्यांचा वाढणार वेग 
कोरोनाच्या संकट काळात रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. कोरोनानंतर रेल्वे गाड्या पूर्ववत होण्यापूर्वी गाड्यांची वेळ कमी करून गाड्यांचा वेग वाढविण्याचे नियोजन सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे, कमी प्रवासी असलेल्या स्थानकांवरील थांबे कमी केले जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील केम, माढा येथील थांबे काही रेल्वे गाड्यांसाठी रद्द करण्यात आले आहेत. प्रवाशांना आरामदायी व वेगवान प्रवास करता यावा, या हेतूने हा बदल केला जाणार आहे. तत्पूर्वी, सोलापूर ते दौंड या मार्गावरील 54 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम मार्च- एप्रिल 2021 पर्यंत संपविण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT