सोलापूर

महिलेच्या खूनप्रकरणात चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : न्यायालयावर हल्ला करुन सुध्दा न्यायालयाने निर्भिडपणे खटला चालवून महिलेचा खून केल्याप्रकरणात चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांनी सुनावली. 

भिमराव देवराव राठोड (वय 42), राहूल भिमराव राठोड (वय 21), रोशन भिमराव राठोड (वय 19), राजू महादेव चव्हाण (वय 19, सर्व रा. शिवाजी नगर तांडा, अक्कलकोट) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी सुनंदा शंकर घोडके (वय 36) हिचा खुन केल्याप्रकरणी तसेच फिर्यादी रेश्‍मा दादासाहेब पळसे (वय 32, रा.तरट गांव, ता.पंढरपूर जि.सोलापूर) हिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 

आरोपी भिमराव राठोड, राहूल राठोड, राजू चव्हाण, रोशन राठोड हे 3 मे 2015 रोजी जीप (क्र. एम एच 13 ए झेड 8196) यामध्ये बसून सोलापूरकडून मंगळवेढाकडे जात होते. कामती खु येथील गोडबोले बस स्टॉपच्या अलीकडे रेश्‍मा पळसे व तिची बहिण सुनंदा घोडके या दोघी चालत जात होत्या. त्यांनी हात करून जीप थांबविली. आरोपीनी त्यांची जीप थांबवून त्या दोघींना जीपमध्ये घेतले. त्यानंतर जीप कामती बु गावच्या पुढे थोड्या अंतरावर मंगळवेढाकडील बाजूस गेली. त्यावेळी आरोपी भिमराव याने रेश्‍मा हिचा दोरीने गळा अवळला. ती बेशुद झाल्यानंतर त्याच दोरीने तिची बहिण सुनंदा हिचाही गळा आवळला. दोघींच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल काढून घेवून दोघींना कोरवली गावाच्या माळरानावर टाकून दिले. त्यामध्ये सुनंदाचा मृत्यू झाला तर रेश्‍मा ही गंभीररित्या जख्मी झाली होती. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

आरोपीविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालला. या खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये जखमी फिर्यादी, नेत्रसाक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, नायब तहसिलदार के.व्ही.बडवे, तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांची साक्ष महत्वाची ठरली. 

हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांनी निदर्शनास आणून दिले. न्यायालयात सर्व आरोपींना खून प्रकरणात मरेपर्यंत जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 3 वर्षे कारावास, खूनाचा प्रयत्न प्रकरणात जन्मठेप व 15 हजार दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 2 वर्षे कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ऍड. राजेंद्रसिह बायस यांनी काम पाहिले. 

आरोपी भीमराव हा येरवाडा, आरोपी राहूल हा कोल्हापूर, आरोपी राजू हा नाशिक तर आरोपी रोशन हा औरंगाबाद कारागृहात बंदिस्त आहे. खटला चालू असताना यातील आरोपींनी न्यायालयावर हल्ला केला होता. वकिलांना देखील दमदाटी केली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपींविरुध्द वेगळा खटला दाखल केला होता. आरोपीने खटल्यामध्ये सुरुवातीपासून विविध प्रकारचे अडथळे आणले होते व खटल्यामध्ये विघ्न निर्माण केले होते. हा खटला थांबविण्यात यावा, इतर न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावा यासाठी उच्च न्यायालय, प्रमुख जिल्हा न्यायाधिश यांच्याकडे अर्ज केला होते. परंतु उच्च न्यायालयाने विश्वास दाखवून याच न्यायालयात खटला चालविण्याचे आदेश दिले. आरोपीने त्यांच्या वकिलास दमदाटी केल्यामुळे त्याने वकिलपत्र काढून घेतले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आरोपीकरीता स्वतंत्र वकिलांची नेमणूक करण्यात आली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT