4School_20Education 
सोलापूर

शिक्षकांसाठी नवे आदेश ! शाळा सुटल्यानंतरही 'या' वेळेपर्यंत शिक्षकांना शाळेतच थांबावे लागणार

तात्या लांडगे

सोलापूर : शाळा सुरु झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत भरत असून नववी ते बारावीचे वर्ग सकाळ व दुपारच्या सत्रात तीन तासांपर्यंत भरत आहेत. मात्र, मुले घरी गेल्यानंतर शिक्षकही घरी जातात आणि त्यानंतर मुलांना शिकवत नाहीत, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आता मुलांची शाळा सुटल्यानंतरही शिक्षकांनी शाळेच्या वेळेत शाळेतच थांबणे बंधनकारक असून शाळेतूनच घरी असलेल्या मुलांना ऑनलाइन टिचिंग करावे, असा फतवा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला आहे.

पहिली ते चौथीच्या शिक्षकांनाही शाळा बंधनकारक
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, कोरोनाचा धोका अद्याप संपूर्णपणे टळला नसल्याने पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय झालेला नाही. लॉकडाउन काळात घरी बसून ऑनलाइन टिचिंग करणाऱ्या शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परंतु, शाळेतील शिक्षक संख्येच्या 50 टक्‍के शिक्षकांनी एकदिवसाआड शाळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली. शाळेच्या वेळेत पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहून मुलांना ऑनलाइन टिचिंग करणे, पुढील दिवसाचे नियोजन करणे, अशी कामे शिक्षकांनी करावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नऊ महिन्यानंतर नववी ते बारावीच्या शाळा (23 नोव्हेंबरपासून) सुरु झाल्या असून 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. राज्यातील बहुतांश शाळा सुरु झाल्या असून 28 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. दररोज किमान तीन ते चार घड्याळी तास अध्यापन करणे शिक्षकांना बंधनकारक असून त्यामध्ये इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांना प्राधान्य देण्याच्या सूचना शिक्षकांना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, मुलांचे वर्ग सुटल्यानंतर शिक्षकांनी घरी न जाता शाळेच्या वेळेत ड्यूटीवर असायला हवे. शाळेत बसूनच उद्याच्या तासांचे नियोजन, शाळेत न येणाऱ्या मुलांना ऑनलाइन टिचिंग व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधित शाळांमधील मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत. तर कार्यालयीन वेळेत शिक्षकांनी शाळेतच उपस्थित राहावे, याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.


शाळांची सद्यस्थिती
(नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा)
22,204
मुलांची संख्या
56,48,028
शिक्षक
2,27,775
(पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा)
33,487
विद्यार्थी संख्या
32,45,512
शिक्षक
1,45,067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT