Server down the website of the Department of Agriculture Government of Maharashtra 
सोलापूर

कृषी मंत्र्यांचे याकडे आहे का लक्ष?; कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ‘असा’ येतोय मेसेज

अशोक मुरुमकर

सोलापूर : सध्या प्रत्येक विभाग पेपरलेस होत आहे. त्यात कृषी विभाग सुद्धा मागे नाही. शेतकऱ्यांची लाभ घेण्याची प्रत्येक योजना आता ऑनलाईन होत आहे. सरकारचा भरही सध्या ऑनलाईनवर आहे. मात्र, सरकाच्या विभागच यामध्ये कमी पडत असल्याचे चित्र आहे. कृषी विभागाचे संकेतस्थळ ओपन होत नसल्याने माहिती कशी घ्यायची हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीकडे पाहिले जाते. या शेतकऱ्यांच्या अनेक योजनांच्या लाभासाठी सरकार ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करत आहे. मात्र याची माहिती घेण्यासाठी सर्व्हच सुरु नसल्याचे चित्र आहे. सध्या खरीपाचा हंगाम सुरु झाला असून शेतकरी बी- बीयांणांसह विविध योजनेचा लाभ व्हावा म्हणून संकेतस्थळाचा आधार घेत आहे. मात्र, संकेतस्थळ ओपन होत नाही. त्यामुळे शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृषीमंत्री भुसे यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना वर्ष २०२०- २१ ते २०२२-२३ वर्षासाठी मान्यता दिली आहे. ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असल्याचे त्यांनी सांगितले असून या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

मृग बहरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरु, लिंबू व चिकू या फळपिकांसाठी १८ जिल्ह्यांमध्ये तर आंबिया बहरामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू सात पिकांसाठी २३ जिल्ह्यांमध्ये, स्ट्रॉबेरीसाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यात योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. मृग बहाराच्या मोसंबी व चिकू पिकासाठी ३० जून, संत्रा पिकासाठी २० जून (मृग २०२० साठी), पेरू पिकासाठी १४ जून (मृग २०२१ व २०२२), डाळिंब पिकासाठी १४ जुलै अशी अंतिम मुद देण्यात आली आहे. आंबिया बहारमधील द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, मोसंबी व केळीसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा, काजू आणि कोकणातील आंबा पिकासाठी ३० नोव्हेंबर, इतर जिल्ह्यातील आंबा पिकासाठी आणि डाळींबासाठी ३१ डिसेंबर, स्ट्रॉबेरीसाठी १४ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असणार आहे. याची माहिती घेण्यासाठी अनेक शेतकरी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर जात आहेत. मात्र, संकेतस्थळ ओपन होत नसल्याची तक्रार करत आहेत.

काय येत आहे मेसेज
महाराष्ट्र सरकारचे कृषी विभाग हे संकतेस्थळ ओपन केल्यानंतर ‘सर्व्हर दोष! सर्व्हरमध्ये तात्पुरता दोष उद्‌भवला आहे. त्यामुळे आपली विनंती पूर्ण होऊ शकत नाही. कृपया काही मिनीटानंतर प्रयत्न करा. तुमच्या समोर अजूनही हा दोष उद्‌भवत असल्यास कृपया सिस्टीम ॲडमिनिस्टेटला त्याबाबत कळवा.’ या संकेतस्थळावर एक कोटी सहा लाख ८४ हजार ९२३ जणांनी भेट दिली आहे. त्यात आज चार हजार ८५७ जणांनी भेट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT