What Sharad Pawar said in Facebook Live 
सोलापूर

जाणून घ्या! शरद पवारांनी उल्लेख केलेले घेरडी प्रकरण काय आहे

अशोक मुरुमकर

सोलापूर : घेरडी (सांगोला) येथे बैल आणि घोडा यांची शर्यत घेतली. हा सोहळा करण्याची खरच गरजच नव्हती. पण लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, याचा आनंद आहेच. पण तशीच तत्पर्ता दिल्लीत दाखवली असती, तर कदाचित आज जे घडतय ते पहाण्याची वेळ आली नसती, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. 
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या (कोविड- १९) संदर्भात खासदार शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी शरद पवार यांच्याकडे व्यथा मांडली. त्यात दिल्लीतील प्रकरणावर बोलताना दिल्लीत पोलिसांनी तत्पर्ता दाखवणे आवश्‍यक होते, असे मत व्यक्त केले. दिल्लीत खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात ही अशा कार्यक्रमांना परवानगी मागण्यात आली होती. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली नाही. पंढरपूर येथील स्वप्नील गावडे यांनीही शरद पवार यांना प्रश्‍न विचारला होता. 

काय आहे घरेडीतील प्रकरण...
सांगोला तालुक्यातील ‘सकाळ’चे पत्रकार दत्तात्रय खंडागळे म्हणाले, घरेडी येथे ३१ मार्चला बैल- घोडा शर्यत झाली होती. त्यात संयोजकांसह १० वाहकांवर गुन्हा दाखल झाला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नागरिकांमध्ये माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिबंध असताना व सध्या राज्यात संचारबंदी असतानाही बैल व घोडा जोडीच्या गाड्यांच्या शर्यत घरेडी येथे घेण्यात आली होती. त्याबद्दल संयोजक तसेच बैल व घोडा जोडी गाड्यांचे 10 अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. संचारबंदीच्या काळात संयोजक संतोष नामदेव खांडेकर (रा. घेरडी ता. सांगोला) व इतर अज्ञात संयोजकांनी दिनांक 31 मार्चला सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये बैल व घोडा जोडीच्या गाड्यांच्या शर्यतीचे बक्षीस तत्वावर आयोजन करण्यात आले होते. संयोजकांनी गणपती पट्टा येथे अंदाजे 6 किलोमीटरवर पळून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी येणे असे शर्यत लावली होती. संयोजकांनी संगनमताने घेरडी (ता. सांगोला) येथे शर्यतीचे आयोजन करुन बैल व घोड्याला त्रास होईल असे चालकांनी कृती केले आहे. तसेच सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम 144 लागू असतानादेखील पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन या शर्यतीचे आयोजन केले, असा आरोप करण्यात आला. यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

दिल्लीतील काय आहे प्रकरण
दिल्लीमध्ये तबलीगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीतील निजामुद्दीन इथं मुस्लिम संस्था तबलीगी जमातचं मुख्यालय आहे. येथे मार्चमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. देशात लॉकडाऊन असतानाही इथे मोठ्या संख्येनं लोक एकत्र राहात असल्यामुळे अनेकांमध्ये आजारपणाची लक्षणं दिसून आली. देशातील कानाकोपऱ्यातून येथे लोक गेले होते. ते पुन्हा आपापल्या घरी परतल्याने कोरोनाची लगण असलेल्यांची संख्या वाढण्याचा धोका आहे. सोलापूर जिल्ह्यातील काहीजण दिल्ली येथे गेल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्यातील तपासणी केलेल्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara fraud Case: तमिळनाडूच्या महिलेची साताऱ्यात फसवणूक; १२ लाख अन् सात ताेळे साेने, परस्‍पर विक्री, विश्वास नडला, नेमकं काय घडलं!

Paithan News: जायकवाडी धरणाचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत ; नाथसागर धरण अंधारात

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; इराणवरील हल्ले १० दिवसांसाठी थांबवले, मध्यपूर्वेतील तणाव होणार कमी?

मोठी बातमी! जमिनीच्या प्रत्येक पोटहिश्श्याची मोजणी आता 200 रुपयांत होणार; महसूल विभागाचा निर्णय, 7/12 उताऱ्यावरील सर्वांच्या संमतीची अट, वाचा...

आजचे राशिभविष्य - 27 मार्च 2026

SCROLL FOR NEXT