पश्चिम महाराष्ट्र

थकीत एफआरपीप्रश्नी एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा टक्के व्याजाच्या रकमेचे घोंगडे अडकून आहे. अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्यावतीने एफआरपी व त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले. 

थकीत एफआरपी व त्यावरील पंधरा टक्के व्याजाच्या मागणीसाठी आंदोलन अंकुशने आंदोलने केली आहेत. तर जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्यावतीनेही या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने म्हणाले, याआधीही पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन केले होते. 1 मे रोजी पुन्हा आंदोलन करण्यात आले.

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांची भेट घेऊन 30 मे पर्यंत एफआरपीची रक्कम देण्याचे आदेश देऊ. मुदतीत एफआरपी न मिळाल्यास आरआरसी कारवाईतून हि रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल यासाठी प्रयत्न करण्याची लेखी ग्वाही दिली. 

30 जानेवारीला ऊस बिले थकविणाऱ्या 39 कारखान्यांवर व यानंतर टप्प्याटप्प्याने इतर कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याने कारखान्यांनी बिले देण्यास सुरुवात केली. काही कारखान्यांचा अपवाद वगळता 31 जानेवारी अखेर थकीत रकमा शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आरआरसी कारवाईत नमूद पंधरा टक्के व्याजाला मात्र फाटा देण्यात आला.

कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून व्याजासह कर्जाची वसूली केली आहे. मात्र हक्काच्या व्याजाला शेतकरी मुकला आहे. हा हक्क शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही कारखान्यांनी एक जानेवारीपासून तुटलेल्या उसाची बिलेही अद्याप दिली नाहीत. याच मागणीसाठी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

साखर आयुक्त श्री गायकवाड यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. पाच जून अखेर एफआरपी थकविलेल्या कारखान्यावर आरआरसी कारवाई व पंधरा टक्के व्याज वसूल करुन आरआरसी कारवाई पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन त्यांनी दिल्याचे श्री चुडमुंगे व श्री माने यांनी सांगितले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT