पश्चिम महाराष्ट्र

‘एफआरपी’चे आंदोलन पेटले

सकाळवृत्तसेवा

जयसिंगपूर - एकरकमी ‘एफआरपी’ची मागणी डावलून पहिली उचल २३०० रुपये जमा केल्याने आक्रमक झालेल्या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी जवाहर, दत्त व गुरुदत्त या साखर कारखान्यांना टाळे ठोकले. एफआरपीवरून शिरोळ तालुक्‍यात स्वाभिमानी आक्रमक झाली.

याप्रश्नी सहसंचालक कार्यालयात बैठका होऊनही एकरकमी एफआरपी मिळाली नाही. दरम्यान, शुक्रवारी कारखान्याने एकरकमी एफआरपीचे तुकडे करून पहिली उचल २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. यावर स्वाभिमानीने आक्रमक भूमिका घेऊन कुरुंदवाड शहरातील जवाहर, गुरुदत्त, दत्त, पंचगंगा, शरद, बेडकिहाळ, दत्त इंडिया या कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून सरकार व कारखानदारांचा निषेध केला.

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली कारखानदार व सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत शरद कारखान्याच्या विभागीय कार्यालयांत जाऊन कार्यालये बंद ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर पंचगंगा विभागीय कार्यालयाचे गेट मोडून कार्यालयाच्या दरवाजावर जोपर्यंत एकरकमी एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत कार्यालय उघडायचे नाही, अशी नोटीस दरवाजावर लावली. 

कुंभोजला ‘राजाराम’च्या कार्यालयास टाळे
कुंभोज : येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या कार्यालयास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. ‘एफआरपी’चे तुकडे करून २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. ही उचल मान्य नसल्याने स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. येथील शिवाजीनगर वसाहतीत असणाऱ्या राजारामच्या कार्यालयाकडे कार्यकर्ते आले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून टाळे ठोकले. यानंतर इतर कारखान्यांच्या कार्यालयात जाऊन  एफआरपीचे तुकडे करून दिल्यास टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब एडके, प्रकाश पाटील, महेश पांडव, भरत भोकरे, शिवाजी किबिले, राजकुमार तोरस्कर, जालिंदर कोळी, सचिन कोळी, आदिनाथ पाटील, महेश माळी, राजाराम कोळी, महावीर पाटील आदी उपस्थित होते.

कुरुंदवाड येथेही आंदोलन
कुरुंदवाड : येथील सर्वच साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी आंदोलक कार्यकर्ते आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३०० रुपये वर्ग केल्याचे समजताच शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याचाच परिणाम म्हणून येथील साखर कारखान्यांच्या गेटकेन कार्यालयाला कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून आंदोलन सुरू केले आहे. 
यावेळी आण्णासाहेब चौगुले, शहर अध्यक्ष दत्तात्रय गुरव, जिनाप्पा भबीरे, मोनाप्पा चौगुले, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, बाहुबली पाटील, सचिन पाटील, सदाशिव मगदूम, शांतिनाथ भबीरे, नंदकिशोर पाटील, धोंडिराम चौगुले आदी उपस्थित होते.

अनेक ठिकाणी नुकसान
आक्रमक कार्यकर्त्यांनी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील जवाहर कारखान्याच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा वळविला. कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयातील खुर्च्या, टेबल, खिडक्‍या, कपाटे अशा साहित्याची नासधूस केली. त्यानंतर लक्ष्मी रोडवर असलेल्या ‘दत्त’च्या विभागीय कार्यालयातील खुर्च्या, टेबल, कपाटे आदी साहित्य फोडून कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर शिरोळ मार्गावरील गुरुदत्तचे विभागीय कार्यालय हे बंद असल्याने कार्यकर्त्यांनी गेट व दरवाजा मोडून कपाटे, खुर्च्या, संगणक यासह इतर साहित्याची मोडतोड केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT