पश्चिम महाराष्ट्र

दोनच महिन्यांत तीनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

सोलापूर -  जानेवारी व फेब्रुवारी २०१९ या दोन महिन्यांत राज्यातील २८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक ९६ आत्महत्या अमरावती विभागात, औरंगाबाद विभागात ९१ तर नाशिक, पुणे, नागपूर व कोकण विभागातील ९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

सततचा दुष्काळ, हमीभावाची प्रतीक्षा, पिकांचे गडगडलेले दर आणि बॅंकांकडून कर्ज वाटपाला ठेंगा, खासगी सावकारांचे अवास्तव व्याज आणि पैशासाठी त्यांचा तगादा या प्रमुख कारणांमुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. २००१ ते २०१३ या १३ वर्षांच्या कालावधीत राज्यातील १५ हजार ६६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुसरीकडे मागील पाच वर्षांत (२०१४ ते फेब्रुवारी २०१९) तब्बल १४ हजार ३४३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.

घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा भीषण प्रश्‍न निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत  आहे.

शेतकरी आत्महत्या वाढणे हे आपल्यासाठी भूषावह नसून आत्महत्या थांबाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रिपणे तोडगा काढण्याची गरज आहे. कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, त्यांना कुटुंबाचे व त्यांच्या जीवनाचे महत्त्व पटवून देण्याकरिता प्रबोधनाची गरज आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न आहे.
- सुभाष देशमुख, सहकारमंत्री

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT