toilet
toilet 
पश्चिम महाराष्ट्र

शासनाच्या हागणदारीमुक्त गाव योजनेला दुष्काळी परिस्थितीचा फटका

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : शासनाने गावे हागणदारीमुक्ती साठी विविध प्रकारच्या उपाय योजना सुरू केल्या. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने अंमलबजावणी सुध्दा केली गेली मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली पाणीटंचाई व त्यात शासनाच्या पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण भागातील नागरीक शौचालयास उघड्यावरच जात असल्याने, शासनाच्या ह्या हागणदारी मुक्त गाव या योजनेचा चांगलाच फज्जा उडाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत असुन, दिवसागणिक लोटाबहाद्दारांची रस्त्यावर संख्या वाढत चालली आहे.

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर खर्च करण्यात आला.

गुडमॉर्निंग पथक तयार करून, हे पथक पहाटे ५ ते ८ या वेळात उघड्यावर शौचास जाणार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत होते. त्यामुळे गावे हागणदारमुक्ती होण्यास प्रयत्न झाला. परंतु सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. नागरिकांची पाण्यासाठी मारामार सुरू झाली. हंडाभर पाण्यासाठी रात्रदिवस एक करावा लागत असताना. त्यात शौचालयासाठी पाणी आणायचे कोठून असा प्रश्न नागरिकांना पडला असुन, हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभिमानाला अडथळा ठरत आहे. परिणामी नाईलाजाने नागरिक शौचालयास दरवाजे बंद करून उघड्यावर शौचालयास जावे लागत आहे. यात महिलांची कुचंबणा होत आहे. सकाळीच्या वेळी फेरफटका मारला असता लोटापरेड करणार्यांची संख्या दिसते.

गेल्या पाच वर्षापासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छेतेवर चांगलाच भर दिला आहे. शौचायलाच्या जनजागृतीसाठी कोट्यावधी रूपये खर्च करून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने प्रभावीपणे राबविलेली हि योजना सध्याच्या स्थितीला पाण्यावाचुन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गावोगावी दुर्गंधीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर गुडमाॅर्निग पथक तयार करून शौचालयाचाच वापार करण्यासाठी प्रोत्साहन करावे. पाण्याची भीषण टंचाई आहेच. त्यासाठी शासनाच्या वतीने टॅंकर सुरू करण्यात आलेले आहेत. 
- गोकुळदास बैरागी, गटविकास अधिकारी कुर्डवाडी 

अद्यापही काही जण शौचालयापासुन वंचित आहेत. त्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे. तरी शासनाने तातडीने मंजुर करावीत म्हणजे गाव हागणदारमुक्ती हातभर लागेल. 
- संजय नागटिळक, सरपंच उपळाई बुद्रूक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT