tarale
tarale 
पश्चिम महाराष्ट्र

मोगरवाडी ग्रामस्थांची शाळेच्या व गावच्या विकासासाठी दोन लाखांची मदत

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे - तारळे विभागातील मोगरवाडी हे स्थलांतराच्या मार्गावर असणारे छोट्याशा गावाने इतर मोठया गावांच्यापुढे आदर्श निर्माण केला आहे. 15 ते वीस कुटुंबे असणाऱ्या या वाडीने आपल्या कष्टाचे व श्रमाचे पैसे जमा करत थोडे थोडके नव्हे तर तब्बल दोन लाख रुपयांची रोख मदत येथील शाळा व इतर कामांसाठी सुपूर्द केली. या त्यांच्या कर्तृत्वाने इतर मोठया गावांना आदर्शवत उदाहरण घालून दिले असून याची सर्वदूर चर्चा सुरू आहे.

स्वातंत्र्यानंतरही हे गाव कच्च्या रस्त्यापासूनही वंचित आहे. पक्का रस्ता त्यांच्यासाठी अजूनही स्वप्नच आहे. मोडक्या तोडक्या घरात राहणारी जेमतेम वीस कुटुंबे त्यातही महिला ज्यादा. केवळ तुटपुंजी शेती व पशुपालन हेच उदरनिर्वाहचे साधन. काही मैल चालत जाऊन आणावे लागणारे पाणी, वीज आहे पण गेलीच तर कधी येईल याची शास्वती नाही. अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याने अनेकांनी काम धंद्यांसाठी शहराची वाट धरलेली आशा स्थितीत असणाऱ्या या गावाला एका ध्येयवेड्या शिक्षकाने बद्दलविण्याचा चंग बांधला.

त्यामुळे मोगरवाडीत हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली. दीपक मगर या शिक्षकांनी येथील ग्रामस्थांना एक करीत अनेक बदल घडविले. त्यात गावचा कच्चा रस्ता, बोअरवेल, शाळा खोल्या, तंबाखु मुक्त व स्वच्छता अभियान, मंदिर जिर्णोद्धार, स्मशानभूमी आदी कामांना वेग घेतला. सामाजिक जाणीव असणाऱ्या मित्र मंडळींनी त्यास हातभार लावला. दोन वेळा शेकडो लोकांचे श्रमदान, कोंजवडे ग्रामपंचायतीच्या वतीने मिळालेले ई लर्निंग किट, तारळेचे सुपुत्र सुहास नेमाने यांची नववर्षाची लाख मोलाची मदत गावाला झाली. अनेकांनी अनेक रूपांनी मदतीचा हात पुढे केला. याच प्रेरणेतून येथील गरीब असलेल्या मात्र मनाने श्रीमंत असलेल्या या डोंगरातील लोकांनी आपल्या कष्टाने जमवलेली पै अन पै गोळा केली अन तब्बल दोन लाख जमवून शाळा व गावच्या विकासासाठी स्वतःचे लाखमोलाचे योगदान मोगरवाडी करांनी दिले. छोटेखानी झालेल्या समारंभात ही रक्कम गावकऱ्यांनी शिक्षक दिपक मगर यांच्या स्वाधीन केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे बातमीदार यशवंतदत्त बेंद्रे, शिक्षणप्रेमी उद्योजक उदय तोडकर तसेच शाळा समिती अध्यक्ष तानाजी शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

झणझणीत अंजन
या कृतीने मोगरवाडी ग्रामस्थांनी अनेक मोठी गावे, शासकीय व प्रशासकीय यंत्रणा, राजकिय पदाधिकारी, समाजातील श्रीमंत वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. आपल्या गावचा विकासात इतर यंत्रणांचे सहाय्य मिळाले तर ठीकच नाहीतर स्वबळावर स्वयंविकसित होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. याची दखल शासकीय व राजकिय पातळीवर घेणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामस्थांचा निर्धार इतरामसाठी चपराक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT