Two thousand new patients found in 25 days in rural areas 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण भागात 25 दिवसांत आढळले दोन हजार नवीन रुग्ण

अजित झळके

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली होती. आता ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याचा वेग अधिक झाला. गेल्या 25 दिवसांत तब्बल दोन हजार नवीन रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. 24 मार्च ते 31 जुलै या काळात ग्रामीण भागात दररोज आठ इतक्‍या सरासरीने रुग्ण सापडत होते.

ती सरासरी ऑगस्टमध्ये रोज 80 झाली आहे. दुसरीकडे पावणेदोनशे गावे आणि वाड्यांनी कोरोनाला सीमेवरच रोखण्यात यश मिळवले आहे. 
कोरोनाची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. या स्थितीत ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती आहे. शहरातील यंत्रणेवर त्याचा प्रचंड ताण आला आहे. आता रुग्णांना खाटा मिळत नसल्याचे चित्र समोर आलेय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या तीन हजार झाली. ती जुलैअखेर 1 हजार 36 इतकी होती. कोरोनाचा शहरी भागातील वेग गतीने वाढत असताना ग्रामीण भागात मात्र कोरोना थोपवण्यात यश आले. जूनअखेरपर्यंत त्याचा वेग अत्यल्प होता. गावांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शिराळा आणि जत तालुक्‍यातील काही गावांचा अपवाद वगळता ग्रामीण भाग तुलनेत सुरक्षित होता. आता सातशेपैकी फक्त पावणेदोनशे गावे आणि वाड्यांवरच कोरोना पोहचायला बाकी आहे. त्यांनी काटेकोर नियोजन, शिस्त, गर्दी टाळून कोरोना येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरी भागातील कोरोना नियंत्रणात आणताना ग्रामीण भागातील फैलावही नियंत्रणातच राहील, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना केली होती. आता परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत निघाली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य यंत्रणा सहन करू शकत नसल्याचे स्पष्ट व्हायला लागले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांनाही फार लक्षणे नसतील तर घरीच थांबवून उपचार द्यावे लागणार आहेत. त्याची सुरवात काही ठिकाणी झाली आहे. 

प्रमुख कारणे काय? 
ग्रामीण भागात मार्च ते जुलै या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग मर्यादित होता. या भागातील लोकांचा शहरी भागात संपर्क मर्यादित होता. तो ऑगस्टमध्ये वाढला. नोकरी, व्यवसाय, कामाच्या निमित्ताने शहरातील आवक-जावक वाढली. बाधिताच्या संपर्कात आलेल्यांवर नियंत्रण करण्यात यंत्रणा कमी पडत आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे नियम काटेकोर पाळले जात नाहीत. 

120 जणांचा मृत्यू 
ग्रामीण भागातील 120 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यात आटपाडी तालुक्‍यातील 4, जत 7, कडेगाव 7, कवठेमहांकाळ 4, तासगाव 19, वाळवा 10, खानापूर 3 तर शिराळा तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. 


तालुकानिहाय रूग्णसंख्या 

आटपाडी - 373 
जत - 310 
कडेगाव - 198 
कवठेमहांकाळ - 277 
खानापूर - 242 
मिरज - 818 
पलूस -  286 
शिराळा - 389 
तासगाव - 323 
वाळवा - 532 

ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यात दोन सर्वेक्षण फेऱ्या झाल्या. 50 वर्षावरील लोकांची सर्वेक्षण करत आहोत. आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी, सहायक, सेवक अशी टीम आहे. कुठलीही लक्षणे नसलेल्या 590 लोकांना बाधा झाल्याचे शोधून काढले. मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष असेल. पुढील काही दिवसांत 40 हजार अँटीजेन तपासण्या होतील. लवकर अहवाल प्राप्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी. 


 
सांगली 
संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT