पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : मोदी, अमित शहा यांना झोपेत पण पवार दिसत असतील

सकाळ वृत्तसेवा

सांगली - आम्हाला गृहमंत्री अमित शहा विचारतात तुम्ही काय केले. पण तुम्हीतर मोदींच्या मागे फिरत फिरत मंत्री झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुम्हीच सांगा पाच वर्षात काय दिवे लावलेत. आता तुम्हाला रात्री झोपेत पण आम्ही दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

श्री. पवार म्हणाले, सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी करायचा असतो. या सरकारला ते विस्मरण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये अवस्था या सरकार विरोधात दिसत आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही चितेची बाब आहे. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आम्ही सरसकट कर्जमाफी केली. पण भाजप सरकारने सरसकट कर्जमाफी केली नाही. आमचे सरकार तुमच्या दुखण्यामध्ये सहभागी होत होते. पण आत्ताचे सरकार तसे नाही.

शरद पवार म्हणाले...

  • सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे 50 टक्के कारखाने बंद पडले आहेत. 
  • विमान कंपन्या बंद पडले आणि 20 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
  • केंद्र आणि राज्य सरकार काहीच करत नाही..
  • शेती संकटात, बेरोजगारी वाढली अनेक उद्योग बंद पडले कसे
  • स्वर्गीय आर आर पाटील यांनी डान्सबार बंद केले आणि हे लोक छमछम दाखवत आहात. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. 
  • पाच वर्षात काय केले तर ते सांगतात 370 ही काय भानगड आहे. 370 काढले आणि आता म्हणतात 370 लावून दाखवा. हे काय.. 
  • शेतकरी कर्ज बाजारी, तरुण बेरोजगारी आहे. पण यांचे सकाळ संध्याकाळ 370 हेच भाषण चाललंय. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT