पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : युतीमध्ये ‘जनसुराज्य’ला हव्यात नऊ जागा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील चार जागांवर श्री. कोरे यांनी दावा सांगितला आहे. 

मागितलेले मतदारसंघ

  • कोल्हापूर जिल्हा - शाहूवाडी, हातकणंगले, चंदगड व करवीर, सांगली जिल्हा -  जत,
  • सोलापूर जिल्हा - सोलापूर मध्य,
  • लातूर जिल्हा - लातूर शहर
  •  नाशिक जिल्हा - मालेगाव,
  • मुंबई - मुंबादेवी.

लोकसभा निवडणुकीत श्री. कोरे यांनी तटस्थ भूमिका घेताना कार्यकर्त्यांना मुभा दिल्याने बहुतांशी कार्यकर्ते शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात होते. भाजप-सेनेची युती निश्‍चित आहे, अशा परिस्थितीत श्री. कोरे यांच्यासाठी शाहूवाडी मतदारसंघ सोडणे भाजपला अडचणीचे आहे. कारण, या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील-सरूडकर प्रतिनिधित्व करतात. विधानसभेला इतर मतदारसंघात ‘जनसुराज्य’ची ताकद मिळेल, या उद्देशाने भाजपने त्यांना सोबत घेतले आहे. अलीकडेच त्यांच्याही कारखान्याला सरकारने आर्थिक मदत केली आहे. या जोरावर श्री. कोरे यांनी महाराष्ट्रातील नऊ जागा आपल्याला मिळाव्यात, अशी मागणी काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीत केली आहे. 

दुसरीकडे ‘जनसुराज्य’ला सोबत घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. शाहूवाडी मतदारसंघ आघाडी काँग्रेसच्या वाट्याला आहे. सद्यस्थितीत काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागताना आघाडीत जो निर्णय होईल, त्यासोबत राहाण्याचे आश्‍वासन दिले आहे; पण तोपर्यंतच श्री. कोरे यांनी भाजपशी संधान बांधल्याने आघाडीसमोरही शाहूवाडीत उमेदवारीचा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

युतीच्या निर्णयानंतर ठरेल - कोरे
यासंदर्भात श्री. कोरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘आम्ही भाजपकडे नऊ जागांची मागणी केली आहे. भाजप, सेना युतीचा निर्णय झालेला नाही, तो झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या इतर पक्षांना किती जागा सोडल्या जातील, त्यावर आम्हाला किती जागा मिळतील, हे अवलंबून आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT