पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’चा कहर

सकाळवृत्तसेवा

सातारा - वातावरणातील बदलामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’ने कहर केला असून, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या रांगाच्या रांगा दिसून येत आहेत. त्यातच ‘स्वाइन फ्लू’च्या साथीचे प्राबल्य वाढल्यामुळे जिल्हावासीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून तातडीच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

पावसाने नुकतीच उघडीप घेतली आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे वातावरणात तब्बल तीन महिने गारवा होता. अचानक पावसाने उघडीप दिली. त्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविण्यासाठी अनेक ठिकाणी मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आला आहे. तसेच पावसामुळे रस्त्यावर आलेल्या माती व घाणीची धूळ तयार झाली आहे. अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे तसेच धुळीमुळे जिल्ह्यात ‘व्हायरल फिव्हर’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामध्ये ताप, सर्दी-खोकला व डोकेदुखीच्या आजारांचा समावेश आहे. जवळपास प्रत्येक घरात सध्या एक तरी रुग्ण आहेच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास आहे. 

आजाराच्या साथीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांच्या रांगा लागत आहेत. जिल्हा रुग्णालयातील बाह्य व आंतररुग्ण विभागात तर, दुप्पटीने वाढ झाली आहे. सकाळच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ एकपर्यंत असते. मात्र, बारा वाजेल तरी, केसपेपर काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागाची वेळही अपुरी पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंतररुग्ण विभागात दाखल करून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. कॉटच्या संख्येपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत आहेत. लहान मुलांच्या वॉर्डचीही तीच अवस्था आहे. ‘व्हायरल फिव्हर’मध्ये अचानक ताप चढत असल्याने धोक्‍याचे अनेक प्रसंग निर्माण होत आहेत. व्हायरल आजाराबरोबर जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’च्या साथीनेही थैमान मांडले आहे. 

या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘स्वाइन फ्लू’ची लस कोठे मिळते का? याबाबत मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू आहे. मात्र, लसीबरोबर ‘स्वाइन फ्लू’च्या औषधांचा खासगी मेडिकलमध्येही तुटवडा आहे.  
‘व्हायरल फिव्हर’च्या आजारांसाठी आवश्‍यक असलेल्या अधिक ताकदीच्या ॲन्टीबायोटिक्‍सचाही शासकीय रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामुळे नागरिकांमधील धास्ती अधिक वाढली आहे. जिल्ह्यातील आरोग्याची एकंदरीत परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे.

ब्लॉक मीटिंग
दरम्यान, ‘स्वाइन फ्लू’च्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांचे तसेच खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी ब्लॉक मीटिंगचे नियोजन केले आहे. १५ दिवस संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम चालणार आहे. त्यामध्ये आजारांबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी व औषधांच्या उपलब्धतेबाबत काळजी घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालयातही याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, रुग्णांची संख्या पाहता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्‍यक बनले आहे.

आठ जणांचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू 
जिल्हा रुग्णालयात सुमारे ५६ जणांनी आतापर्यंत ‘स्वाइन फ्लू’चे उपचार घेतले आहेत. तर, आठ जणांचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात झाली आहे. त्यापेक्षा अधिक रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झालेल्या काही रुग्णांची नोंदही शासकीय यंत्रणांकडे झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT