पश्चिम महाराष्ट्र

खासदार संजय पाटील यांचा हिशेब जनताच करेल - विशाल पाटील

सकाळवृत्तसेवा

सांगली - तीन राज्यांतील निकालांनी भाजपची हवा संपल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मोदी लाटेवर स्वार होऊन खासदार झालेल्या आणि कोट्यवधीची कामे केल्याचा दावा करणाऱ्या संजय पाटलांचा हिशेब यावेळी सांगलीची जनता चुकती करेल, असा टोला वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी लगावला. पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभेला निवडून आणण्यासाठी आपण जिवाचे रान करू, असे सांगून त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीच्या साठमारीत आपण नसल्याचेही स्पष्ट केले.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसवर जनतेने पुन्हा विश्‍वास दाखवला आहे. महाराष्ट्रातही लोसकसभा व विधानसभेला असेच परिवर्तन घडेल असा विश्‍वास व्यक्‍त करून ते म्हणाले,‘‘गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्यात कोणताही ठोस विकास झालेला नाही, ही जनतेची भावना आहे. मात्र रस्ते विकासासाठी आलेला निधी आपल्यामुळेच आला असे भासविण्याचा प्रयत्न भाजप नेते करतात. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पाटील म्हणतात की, सध्या अकरा हजार कोटींची कामे सुरू आहेत. गेल्या पन्नास वर्षांत जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी भाजप सरकारने साडेचार वर्षांत दिला असल्याचा खासदारांचा हा दावा हास्यास्पद आहे.

वस्तुस्थिती अशी आहे, की सरकार कोणाचे असले तरी पायाभूत विकासासाठी ठराविक निधी हा राज्यांसाठी केंद्रांकडून येतच असतो. तो आता आपणच आणला असे सांगून दिशाभूल केली जात आहे. येथे विकास झाला नसल्यानेच येथील तरुणाईवर रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ आली आहे. यांनी विकास केला असता तर जिल्ह्यातील लोकांना पुन्हा दुष्काळाला समोरे जावे लागले नसते.

जनेतला मामा बनवू नका...
विशाल म्हणाले,‘‘जिल्ह्यात गेल्या ५० वर्षांत निधी आला नाही असे खासदारांना म्हणायचे आहे काय? वास्तविक ते खासदार होण्यापूर्वी टेंभूचे पाणी आटपाडीमध्ये पोहोचले होते, तर म्हैसाळचे पाणी जतला पोहोचले होते. ताकारी म्हैसाळ योजनांचे काम बहुतांशी पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील महामार्गाची कामे जुनीच प्रस्तावित होती. निवडणुकीपूर्वी खासदारांनी जी आश्वासने दिली होती, तr पूर्ण करावीत. उद्योग, व्यवसाय आणून तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी किती रोजगार आणले हे सांगावे? सध्या आकडे दाखवून ते जनतेला मामा बनवत आहेत.’’

संजयकाकांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा ते कोणत्या पक्षात होते याचा विसर त्यांना पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांनी प्रवास केला, राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विधानसभेची निवडणूकही अपक्ष आणि काँग्रेस चिन्हावर लढवली होती. काँग्रेसकडून महामंडळ अध्यक्षपद भोगले, तत्पूर्वी विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला  होता. 

दरम्यान, लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले,‘‘हा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील, आपले लोकसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत येत असते, पण मी यासाठी फार आग्रही राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.’’ ते म्हणाले,‘‘आम्ही पक्षश्रेष्ठींना त्यांच्याकडे मागणी झालेल्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, असे सांगितले असून गटतट विसरून एकमेकाला पाडापाडीचे राजकारण न करता भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट असेल, असेही ते म्हणाले.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT