पश्चिम महाराष्ट्र

नगरला भयमुक्त करेन : मुख्यमंत्री

सकाळवृत्तसेवा

नगर : नगरमध्ये भयमुक्तीचा नारा वर्षानुवर्षे दिला गेला. मात्र, त्यांच्याकडूनच नगरला जास्त भीती आहे. त्यांची गुंडशाही व झुंडशाही कुणाची याचीही माहिती आहे. तुमच्यापासून नगरला मी भयमुक्‍त करेन, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगरमध्ये मांडली.

नगर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजपच्या उमेदवारांसाठी शहरातील गांधी मैदानात आयोजित सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार सुरजितसिंग ठाकूर व सुरेश धस, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व जिल्ह्यातील स्थानिक आमदार, उमेदवार व पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, "मुलभूत सुविधांची वाट लागली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रस्त्यांची अवस्था बकाल झाली. रोजगाराच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे नगर शहरला बदलाची आवश्‍यकता आहे. येथील पिण्याच्या पाण्याचा, सांडपाणी, घनकचऱ्याचा प्रश्‍न महत्वाचा आहे. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे नगरचा विकास खुंटला आहे. शहराचे आरोग्यच खराब झाले आहे. ते सुधारण्याची गरज आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT