पिंपरी-चिंचवड

श्रमिकांच्या हातांना मानाचा मुजरा

CD

श्रमिकांच्या हातांना
मानाचा मुजरा

एक मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्व कामगार बंधूंना मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत राज्य विकसित करण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले आहेत. हे सर्व सिद्धीस नेण्यासाठी अनेक कामगारांनी रक्ताचे पाणी करून, घाम गाळून आजचा महाराष्ट्र उभा केला आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला घडविणारे अनेक साहित्यिक, कलावंत, लोकनेते, मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते आणि घाम गाळणाऱ्या असंख्य श्रमिकांच्या हातांना मनापासून मानाचा मुजरा.
- राजेंद्र वाघ, कामगार भूषण

स तराव्या शतकाच्या मध्यापासून युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीने नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. पूर्वी कामगारांचे कामाचे तास तब्बल १५ तास होते. औद्योगीकरण वाढत असताना कामगारांचे शोषण होत असे. त्यामुळे कामगारांचे जीवन हलाखीचे झाले होते. मेहनतीचा योग्य मोबदलाही मिळत नव्हता. अशा अमानवीय वर्तणुकीच्या विरोधात कामगारांनी संघटन केले आणि बंड पुकारले. कामगारांच्या मागणीमधील पहिली मागणी होती, आठ तासांच्या कामाची अट. त्यासाठी चळवळ उभी राहिली. दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना हक्क मिळाला. त्यांच्याकडून धडे घेत अमेरिकेतील कामगार संघटनांनी आठ तास कामाची मागणी केली आणि संप पुकारले. मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले. कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले. योग्य पगार, चांगली वागणूक, पगारी सुट्टी आणि कामाचे आठ तास या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून कामगारांच्या सर्वच जागतिक संघटनांनी एक मे या दिवसाची जागतिक कामगार दिन म्हणून निवड केली. भारतातील लेबर किसान पार्टीने एक मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला.

‘गुणवंत’ हेच भूषण
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाने कामगारांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केले आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी मंडळ काम करत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. त्यापैकी ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ व ‘कामगार भूषण पुरस्कार’ हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. महाराष्ट्रातील कामगारांच्या कामाचे कौतुक, इतरांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पुरस्कार योजना राबविण्यात येते. जो कामगार स्वतःची नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणून निरपेक्ष भावनेने सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्य करत असतो, त्याची निपक्षपातीपणाने पुरस्कारासाठी निवड केली जाते. तसेच जो गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगार आहे, त्याने सातत्याने त्याचे योगदान सुरू ठेवले. तर; त्याला कामगार भूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कार्यक्रम, स्पर्धा, शिबिरे
कामगारांनी स्वतःची कामाची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळावी, तसेच सामाजिक बांधिलकी ही जपून एक चांगला समाज उभारण्यासाठी चांगला माणूस घडावा या हेतूने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ सातत्याने कार्यरत आहे. पूर्वी कामगार म्हटले की, समाज कामगारवर्गाकडे तुच्छतेने पाहायचा. कारण, त्याकाळी काही अपवादात्मक कामगार व्यसनांच्या आहारी जाणारे, सतत कर्जबाजारी आणि कामावर गैरहजर असणारे, गुंड प्रवृत्तीचे असत. कामगाराचा कायापालट व्हावा, तो एक चांगला माणूस घडावा म्हणून आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, यासाठी कामगार कल्याण मंडळाचे अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, शिबिरे, असे अनेक उपक्रम सुरू असतात.

स्पर्धा व शिष्यवृत्ती
कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यस्पर्धा आयोजित केली जाते. तसेच साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यासाठी साहित्य संमेलनाचेसुद्धा आयोजन केले जाते. क्रीडापटूंना ऊर्जा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सामूहिक भावना जोपासण्यासाठी समूहगीत, भजन स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. तसेच कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक
कार्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. अशा सर्व उपक्रमामुळे आज महाराष्ट्रात अनेक कामगार त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत.

संधीचे सोने करा
महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने आणखी एक सांगावेसे वाटते की, प्रत्येक कामगाराने स्वतःच्या कामाची जबाबदारी सकारात्मक भूमिकेने आनंदात पार पाडावी. आपल्या कामाकडे पाहताना, ‘मी देश कार्य करत आहे’ या स्वाभिमानी विचाराने पहावे. स्वतःला आरशात पाहताना, ‘मी एक जागरूक माणूस म्हणून कसे असावे’ याचे उत्तम उदाहरण म्हणून पहावे. संधीची वाट पाहू नका, आलेल्या संकटांना सामोरे जा! त्या संकटांनाच संधी समजा आणि कार्यरत रहा! अशाने संधीचे नक्कीच सोने होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT