पिंपरी-चिंचवड

कामगारांच्या सुरक्षेची खबरदारी अन् उत्तरदायित्वाची जबाबदारी

CD

भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ऑप्टिकल फायबरचे काम करण्यासाठी डक्टमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा १५ ऑगस्ट रोजी गुदमरून मृत्यू झाला. ही घटना निगडीत घडली. याला सात दिवस उलटले आहेत. जमिनीखाली काम करताना खबरदारी घेण्याची कोणतीही सूचना कामगारांना दिली नव्हती. डोक्याला टॉर्च, अंगात जॅकेट, प्राणवायू उपकरण (ऑक्सिजन सिलिंडर), रुग्णवाहिका, कंबरेला सुरक्षा दोरखंड अशी सुरक्षा साधने द्यायला हवी होती. कामगार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहेत का? त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती? त्यांच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी किती होती? रक्तदाब, मधूमेह असे काही विकार किंवा इतर कुठल्या आजारांबाबत त्यांची माहिती घेतली होती? डक्टमध्ये निर्माण होणाऱ्या विषारी वायुचा प्रादुर्भाव झाल्यास तो किती सेकंद स्वतःला तटस्थ राहू शकेल? त्याला त्वरीत बाहेर काढायचेच झाल्यास त्याचे वजन कमी आहे का? त्याला डक्टमधून बाहेर खेचण्यासाठी मॅनहोलजवळ असणारा दुसरा व्यक्ती सक्षम आहे का? या प्राथमिक बाबी तपासणे गरजेचे होते. त्या तपासल्याचे दिसत नाही. परिणामी, विषारी वायू नाका-तोंडात जाऊन चारपैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला.
या डक्टचे झाकण कित्येक वर्षांपासून बंद होते. त्यामुळे पाणी साचून विषारी वायू तयार झाला असावा. तो निघून जाण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी कामगार उतरवण्यापूर्वी डक्टचे झाकण किमान एक ते दीड तास उघडे ठेवायला हवे होते. तत्पूर्वी त्यांना योग्य प्रशिक्षणाचीही गरज होती. कामगारांच्या डोक्याला टॉर्च (२४ व्होल्टपेक्षा कमी) असणे अनिवार्य असते. धोक्याचे संकेत देण्यासाठी आणि कामगाराला बाहेर काढण्यासाठी असे दोन दोरखंड कंबरेला बांधावे लागतात. कामगार सुदृढ असावा लागतो. जवळ ऑक्सिजनचा सिलिंडर, रुग्णवाहिका, स्ट्रेचर, अग्निशामक यंत्रणा उपलब्ध असावी लागते. कामगारांची राज्य कामगार विमा नोंदणी असणे अनिवार्य आहे, ही नियमावली जमिनीखाली काम करणाऱ्या प्रत्येक कामगारासाठी अंमलात आणणे संबंधित संस्थेला बंधनकारक असते. मृत्यू पावलेल्या तीन कामगारांची अवस्था पाहता यातील कोणत्याही नियमाचे ‘बीएसएनएल’कडून पालन झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? याचा शोधून घेण्यासाठी कसून चौकशी करायला हवी. दोषींवर कारवाई व्हायला हवी. मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळायला हवी.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत बहुतांश व्यक्ती कामगार आहेत. या प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. मग सफाई कामगार असोत की कंपनीतील अधिकारी. सर्वांना समान न्याय मिळायला हवा. निगडीतील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांचे कुटुंबिय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या घरातील कमावती व्यक्ती गेली आहे. त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेणार कोण? की मौन बाळगून या प्रकरणावर पडदा पडणार? अशी शंका उपस्थित होते आहे. या प्रश्‍नांची उत्तरे संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT