पिंपरी, ता. २२ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप या आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. तीनपेक्षा अधिक दिवस ताप राहत असल्याने काही वेळा लहानग्यांना रुग्णालयातही भरती करावे लागत आहे.
अचानक होणाऱ्या हवामान बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्यात या आजारांचे परिणाम अधिक दिसून येत आहे. त्यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात लहान मुले आणि त्यांच्या पालकांची गर्दी दिसून येत आहे. सर्दी-खोकल्याचा संसर्ग होत असल्याने मुलांना हे आजार झाल्यास शाळेत किंवा गर्दीत न नेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत. हे आजार होऊ नयेत, म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचेही आवाहन केले जात आहे.
काय आहेत आरोग्याचा समस्या
- सर्दी खोकला व कफ
- जास्त दिवस राहणार तीव्र ताप
- अंगदुखी, डोकेदुखी व अतिसार
चिमुकल्यांची घ्या काळजी
- घराबाहेर जाताना मास्क वापरावा
- बाहेरचे अन्न, पाणी देऊ नये
- हात सतत साबणाने धुवावेत
- प्रथिनेयुक्त आहार द्यावा
- डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू प्रतिबंधक लस द्यावी
- थंड व आंबट पदार्थ देऊ नयेत
लहान मुले आजारी पडल्यास
- आजारी बालकांना बाहेर नेणे टाळावे
- गरम व द्रवयुक्त पदार्थ द्यावेत
- कोमट पाणी व वाफ द्यावी
- डॉक्टरच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत
- खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
संसर्गजन्य आजारांचे प्रमाण सध्या वाढले आहे. हे आजार दोन ते चार दिवसांत बरे न होता जास्त काळ टिकणारे आहेत. सर्दी- खोकला त्यानंतर कफ व जास्त दिवस चालणारा ताप असे आजार वाढत आहेत. त्यामुळे सुरुवातीच्याच काळात अधिक काळजी घेतल्यास आजारांची तीव्रता कमी होऊन पुढील धोका टळू शकतो.
- डॉ. उमेश चौधरी, बालरोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.