सोमाटणे, ता. २९ : संततधार पावसामुळे पवनमावळातील धरणांची पाणीपातळी वाढली असून, सलग दुसऱ्या दिवशीही धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती कायम आहे.
शनिवार मध्यरात्रीपासून पवनमावळात मुसळधार पाऊस सुरू झाला. आढले, पुसाणे व मळवंडी ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर कासारसाई व पवना धरण क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने, अगोदरच शंभर टक्के भरलेली ही धरणे नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पवना धरणातून १४०० क्युसेक्स तर कासारसाई धरणातून ५०० क्युसेक्स प्रमाणे पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे आढले, कासारसाई व पवना या तीनही नद्यांना पूर आला आहे.
पावसाचा जोर आणखी वाढल्यास विसर्गाच्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांनी केले आहे. नदीकाठावरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरे नदीपात्रापासून दूर ठेवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
PNE25V55405
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.