Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

आखाती तणावामुळे मरीन इंधनदर भडकले; मुंबई-मांडवा रो-रोसह पारंपरिक फेरी सेवांचे खर्चाचे गणित बिघडले, प्रवासी व वाहन भाडेवाढ अनिवार्य होण्याची शक्यता
Gulf Tensions Hit Mumbai Waters: Ro-Ro and Ferry Services Face Impending Fare Hike

Gulf Tensions Hit Mumbai Waters: Ro-Ro and Ferry Services Face Impending Fare Hike

sakal

Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : आखाती देशांतील वाढत्या तणावाने जागतिक इंधन बाजार ढवळून निघाला असून, त्याचे थेट पडसाद आता मुंबईच्या सागरी वाहतुकीवर उमटू लागले आहेत. वेग, सोय आणि वेळेची बचत यामुळे लोकप्रिय ठरलेली मुंबई-मांडवा रो-रो सेवेसह पारंपरिक लाकडी फेरी बोटीही महागाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. इंधन दरातील सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे या दोन्ही सेवांच्या खर्चाचे गणित बिघडले असून, लवकरच प्रवासी आणि वाहन भाड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com