पिंपरी-चिंचवड

नोकरभरतीमध्ये भूमिपुत्रांना न्याय द्या

CD

पिंपरी, ता. २३ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देताना महापालिका नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात वाघेरे यांनी फडणवीस यांना मागणीचा ई-मेल केला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘१९६०-७० च्या दशकात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी एमआयडीसी, लष्कराचे प्रकल्प, मिलिटरी डेअरी फार्म, एच. ए. कंपनी अशा अनेक प्रकल्पांसाठी शेकडो स्थानिक शेतकऱ्यांनी जमीन सरकारला दिली आहे. पुणे - मुंबई महामार्ग, पिंपरी औद्योगिक क्षेत्र वाढीसाठी देखील अनेक गावे विस्थापित झाली. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, तळवडे यासारखी अनेक गावे आता शहराचा भाग बनली; पण मूळ रहिवाशांची ओळख धूसर झाली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या, उद्योग आणि शिक्षणाच्या संधी कमी मिळाल्या आहेत. रोजगारासाठी अनेकांना हलकी, अस्थायी कामे स्वीकारावी लागत आहेत.’’
महापालिकेकडे सद्यस्थितीला एकूण ६ हजार ७८४ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून ४ हजार ७७६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर किमान ५० टक्के जागा स्थानिक भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवल्यास स्थानिक भूमिपुत्रांनी शहराच्या विकासासाठी केलेल्या त्यागासाठी त्यांना न्याय मिळणार आहे. महापालिकेच्यावतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेल्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देताना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telesurgery India : नागपूरच्या डॉक्टरांची कमाल! 1 हजार किलोमीटर दूरच्या 2 रुग्णांवर केली रोबोटिक टेलीसर्जरी; भारतातला पहिलाचा प्रयोग

Biotin Rich Foods For Hair Growth: केस गळणे थांबतच नाहीये? आहारात 'या' 5 गोष्टी समाविष्ट करा; लगेत दिसेल फरक!

Khutbav News : पंढरीच्या वारीमध्ये हरवलेले भगत आजोबा एक महिन्याने घरी परतले; गायकवाड यांच्या रूपात पंढरीचा पांडुरंग भेटल्याची भगत परिवाराची भावना

Latest Maharashtra News Updates : फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा सुरुय - रोहित पवार

Local Megablock: मुंबईकरांना करावा लागणार गर्दीचा सामना, मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT