तळेगाव दाभाडे, ता. २५ ः मावळ तालुक्यातील यावर्षी कडक उन्हाळा जाणवत असून, धरणातील साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. पवना धरणात ३७ टक्के, वडिवळे ४० टक्के तर आंद्रा धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे. अद्याप मे महिना संपायचा बाकी असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी-चिचवड शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या शिवाय पवना व आंद्रा धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर मावळातील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. उन्हाळ्याचा अद्याप एक महिना बाकी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.तालुक्यातील पवना धरण हे सर्वात मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती, ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.
सध्या पवनाधरणात ३७ टक्के पाणी साठा आहे. पिंपरी-चिचवड व मावळातील गावांसाठी गेल्या दोन दिवसांपासून एक हजार क्यूसेकने पाणी सोडले आहे. उन्हामुळे बाष्पीभवन वाढून धरणातील जलसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे
- रजनीश भारिया, शाखा अभियंता पवना धरण
वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत आणि अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणात ४० टक्के पाणीसाठा आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे
- संतोष शिंदे,अभियंता वडिवळे धरण
--------------------
२६५४
पवना धरण पाणीसाठा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.