पिंपरी-चिंचवड

तीन गावांत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

CD

वडगाव मावळ, ता. १८ : नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मावळातील दारुंब्रे, चांदखेड व धामणे या तीन गावांमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येणार असून, त्यासाठी तिन्ही गावांतील ३७५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे व कृषी अधिकारी सूर्यकांत कुंभार यांनी या मिशनबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनला मान्यता दिली असून, हे मिशन राबविण्यासाठी केंद्र शासन ६० टक्के तर राज्य शासन ४० टक्के या प्रमाणात निधी देणार आहे.

मिशनची उदिष्टे
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे
- जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे
- रसायनमुक्त सुरक्षित, सकस व पोषणयुक्त नैसर्गिक व सेंद्रिय शेतमाल उत्पादित करणे
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मुल्यसाखळी विकसित करणे
- नैसर्गिक व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे
- कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र यांच्या समन्वयाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे
- समूह संकल्पनेद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे
- शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे

मिशनसाठी तीन गावांची निवड
हे मिशन राबविण्यासाठी मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड व धामणे या तीन गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट स्थापन करण्यात आला आहे. प्रती शेतकरी जास्तीत जास्त एक एकर क्षेत्राचा लाभ द्यावयाचा असल्याने त्यानुसार प्रति गट १२५ या प्रमाणे तिन्ही गावात मिळून ३७५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी यापुढील काळात नवीन सहा शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावयाचे आहे. निवड झालेल्या या लाभार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षक, विद्यापीठ शास्त्रज्ञ, कृषी सखी यांच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक गावात दोन याप्रमाणे सहा कृषी सखींची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृषी सखींना दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यांच्यामार्फत लाभार्थ्यांना प्रशिक्षण व सेंद्रिय शेती अभ्यास दौऱ्यावर नेऊन सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तीन गावांमध्ये दोन जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करण्यात करण्यात येणार असून प्रत्येक केंद्राला एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. उत्पादित माल विक्रीसाठी पणन सुविधा स्थापन करण्यासाठी वाहन खरेदी किंवा विक्री केंद्र बांधण्यासाठी साडेचार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. उत्पादित माल गोळा करण्यासाठी समूह संकलन केंद्र स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रमाणीकरणही करण्यात येणार आहे.

विषमुक्त भाजीपाला व धान्य तयार करण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. ती ओळखूनच शासनाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात मावळ तालुक्यातील दारुंब्रे, चांदखेड व धामणे या तीन गावांमध्ये हे मिशन राबविण्यात येत असून, त्यात तेथे विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर गावांमध्ये हे मिशन राबविण्यात येईल.
- मारुती साळे, मावळ तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोरण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT