Balpudi-Village-Water
Balpudi-Village-Water 
पुणे

दुष्काळप्रवण बळपुडी झाले पाणीदार

सकाळवृत्तसेवा

इंदापूर - इंदापूर तालुक्‍यातील बळपुडी या गावात ६० टक्के क्षेत्र वनीकरणाचे आहे. हे गाव दुष्काळप्रवण क्षेत्रात येते. गावातील जुना मातीनाल बांध गाळाने भरला होता. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तो काढून बांधाचे पुनर्भरण करण्यात आले. त्यामुळे ६० बाय ३० मीटर लांबी रुंदीचे तळे निर्माण झाले. यंदा पावसाळ्यात या गावात एकही पाऊस पडला नसतानादेखील मातीनाल बांधातील पाण्यामुळे या गावचे शिवार फुलले आहे. 

यासाठी तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव, कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, कृषी पर्यवेक्षक हनुमंत बोडके यांनी पुढाकार घेतला. गावातील १० ते १५ टक्के शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थांचे कर्ज घेऊन उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून ७ किलोमीटर अंतरावरून शेतीसाठी उपसा जलसिंचन योजना केल्याने त्यांची शेती बागायती झाली. मात्र, गावातील इतर शेतकऱ्यांना पाणी कमी पडत असल्यामुळे त्यांच्या शेतीचे हाल होतात. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तालुका कृषी खात्याने मातीनाल बांधचे पुनर्भरण जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दहा बोअर घेऊन केले. त्यामुळे तळ्यात उत्तम पाणीसाठा झाला. परिसरात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असताना हे तळे शेतकऱ्यांसाठी आधारवड बनले आहे. तळ्यातील पाण्यावर ऊस, डाळिंब, बाजरी, मका अशी पिके घेतली आहेत. ऊस, मक्‍याचे शिवार हिरवेगार आहे. पावसाने दडी मारली असली तरी हे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत नक्की पुरणार असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक सालचंदीस हातभार लागण्यास मदत होणार आहे; तसेच जनावरांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही.

सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत हे काम करण्यात आले. या तळ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून, त्यामुळे पाऊस पडलेला नसतानादेखील शेतीस पाणी उपलब्ध झाले. हा परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणास आधार मिळाला आहे.
- सूर्यभान जाधव, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर 

इंदापूर तालुका कृषी विभागाच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत पाणी उपलब्ध झाल्याने जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनी जलसंवर्धनासाठी कृषी खात्याच्या सहकार्याने विविध प्रकल्प राबविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
- लहू गाढवे, प्रगतिशील शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT