पुणे

पुण्याला दररोज पाणीपुरवठा शक्‍य  

अनिल सावळे

पुणे - पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता १२०० दशलक्ष लिटर पाणी देण्याची जलसंपदा विभागाची तयारी असून, त्यामुळे शहराला दररोज पाणी मिळण्याची शक्‍यता आहे. शहराच्या तसेच शेतीच्या पाणीवापरात काही प्रमाणात काटकसर केल्यास दिवसाआड पाणीपुरवठ्याची गरज लागणार नाही, असेही या विभागातील सूत्रांनी सूचित केले.

खडकवासला प्रकल्पातून सध्या पुणे महालिका दररोज १३५० एमएलडी पाणी घेत आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ एमएलडी पाणी घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जवळपास निम्मेच पाणी मिळणार असल्यामुळे शहराला दिवसाआड पाणी मिळेल, अशी शक्‍यता होती; परंतु जलसंपदा विभाग ११५० एमएलडी पाणी देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. त्यावर दोनशे एमएलडी पाणी कमी केल्यास दिवसाआड पाणीपुरवठा कसा, असा प्रश्‍न विचारण्यात येत आहे. याबाबत जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, महापालिका खडकवासला प्रकल्पातून पाच पंपाद्वारे पाणी उचलत आहे. त्यापैकी एक पंप बंद करण्यात येणार आहे. महापालिकेला ११५० ऐवजी १२०० एमएलडीपर्यंत पाणी दिले जाऊ शकते. त्यावरून पुण्यावरील दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट टळेल, अशी शक्‍यता आहे, असे सांगण्यात आले. 

शेतीच्या पाणीपुरवठ्यातही कपात?  
शहराला आणि शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी पाहता जुलैअखेर एकूण पाण्याची गरज १९ टीएमसी आहे; परंतु प्रकल्पात १७.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. गरजेच्या तुलनेत प्रकल्पात दीड टीएमसी पाणी कमी आहे. शिवाय, १५ जुलैअखेर पाऊस न झाल्यास धरणांत किमान दीड टीएमसी पाणी आरक्षित ठेवावे लागणार आहे. त्यामुळे ही तूट तीन टीएमसीपर्यंत जाईल. शहराच्या पाणीपुरवठ्यासोबतच सिंचनाच्या पाण्यात कपात केल्यास त्यावर तोडगा निघेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या बाबत जलसंपदा विभागाकडून पुण्यासोबतच सिंचनाच्या पाणीपुरवठ्यातही कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, अंतिम निर्णय हा कालवा समितीच्या बैठकीत होणार आहे.

जलसंपदा विभाग सहमत?
जिल्ह्यात मावळ वगळता उर्वरित तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यातील २४ गावे आणि ३०५ वाड्यावस्त्यांना ४४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केवळ शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याऐवजी सिंचनाच्या पाणीपुरवठ्यातही कपात करावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जलसंपदा विभागातील काही अधिकारीही या मताशी सहमत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा
७ जानेवारी २०१९        १७.३६ टीएमसी    ५९.५५ टक्‍के
७ जानेवारी २०१८        २१.४८ टीएमसी    ७३.६६ टक्‍के 
(गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे चार टीएमसी घट)

पाण्याचा प्रश्‍न हा निसर्गाशी निगडित आहे. त्यात राजकारण आणणे योग्य नाही. जलसंपदा विभाग आणि महापालिकेने हा प्रश्‍न समन्वयाने सोडविणे अपेक्षित आहे. या दोन्ही विभागांनी पाण्याचे नेमके काय नियोजन केले आहे, ते नागरिकांना स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांचा पाणीकपातीबाबत संभ्रम दूर होईल.
- राजेंद्र माहुलकर, पर्यावरण आणि जलतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT