crops
crops 
पुणे

शेतकऱ्यांना उन्हाच्या चटक्याबरोबर महावितरणचा झटका

राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : विद्युत पंपाची बिले थकविणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडीत करुन  महावितरणाने झटका देण्यास सुरवात केली आहे.

राज्यामध्ये महावितरणीची ३९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणाने वीजपुरवठा खंडीत मोहिमेस सुरवात केली आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली अाहे. विहिरींची पाण्याची पातळी घटली असून शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु असताना महावितरणने विद्युत पंपाची बिले थकलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच संपूर्ण विद्युत रोहित्रावरील थकबाकीचे प्रमाण जास्त असल्यास विद्युत रोहित्राचा पुरवठा खंडीत करण्याची मोहिम सोमवार (ता. १९) पासुन सुरवात केली आहे.

महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये सापडला असून विहिरीमध्ये पाणी असतानाही थकबाकीमुळे शेतकऱ्यांची पीके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब पिकांचा बहार धरला अाहे. डाळिंबाच्या झाडांना कळ्या आल्या आहेत. पाण्याची कमतरता झाल्यास कळी गळण्यास सुरवात होणा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासंदर्भात वालचंदनगर परीमंडळाचे महावितरणचे अभियंता मोहन सुळ यांच्याशी संपर्क साधला असताना शेतकऱ्यांनी वीजबिले भरुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT