Adivasi-students
Adivasi-students 
पुणे

आदिवासी विद्यार्थ्यांचे असहकार आंदोलन

कृष्णकांत कोबल

मांजरी : गृहपालाकाडून पोलिसांत खोट्या तक्रारी देऊन वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर आणले जात असलेले दडपण, पुरविल्या जाणाऱ्या अपुऱ्या सोयी-सुविधा, थकीत शैक्षणिक शुल्क, अभ्यासिकेची दुरावस्था आदी विविध कारणांसाठी येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी गेली दोन दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. 
मांजरी स्टड फार्म परिसरात असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहात सुमारे साडेपाचशे मुले राहत आहेत. त्यांना सध्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी या समस्यांबाबत केलेल्या तक्रारींची दखल न घेता उलट त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

प्रशासनानाकडून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जात नसल्याने अनेक बाहेरचे विद्यार्थी येथे बेकायदेशीर राहत आहेत. विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी साधने अपूरी आहेत. स्पर्धा परीक्षेची पुरेशी पुस्तके उपलब्ध नसल्याने त्यासंबंधी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. अभ्यसिकेमध्ये बसण्याची चांगली सोय नाही. मुलांना गर्दीत बसून अभ्यास करावा लागत आहे. या उलट कार्यालयासाठी चांगल्या खुर्च्या घतल्या जात आहेत. जेवणाचा दर्जा चांगला नाही. ठरलेले पदार्थ व भाज्या मिळत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उपाशी पोटी राहवे लागत आहे. मागील वर्षाचे थकीत शैक्षणिक शुल्क अद्यापही मिळालेले नाही. मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा अभाव आहे. आजूनही येथील विद्यार्थ्यांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. एखाद्या घटनेत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याऐवजी थेट पोलीसांना बोलावून दडपण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यातून होणारा त्रास बंद केला जावा, अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने पाहून न्याय द्यावा, या व त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या त्वरीत मान्य केल्या जाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी वसतीगृहा समोर आंदोलन सुरू केले आहे. 

झेंडे, भित्तीपत्रके व घोषणा देत हे आंदोलन केले जात आहे. "प्रत्येक वेळी आम्ही काही रितसर मागणी केली की, विद्यार्थ्यांना बदनाम केले जात आहे.  गृहपाल, सुरक्षा रक्षक, जाग मालक, जेवण पुरविणारा ठेकेदार यांना पाठीशी घालून अधिकारी आम्हाला चुकीचे ठरवत आले आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू करून लोकांसमोर खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.'' अशी भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. "वसतीगृहातील काही विद्यार्थी आपणच येथील प्रमुख असल्याचे भासवून नवीन विद्यार्थ्यांना मानसिक व शारिरीक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. जे विद्यार्थी वसतीगृहात राहत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना येथे बोलावले जात आहे. त्यामुळे येथे अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण होत असतात. सुरक्षा रक्षक, गृहपाल यांनाही त्यांच्याकडून दमदाटी केली जाते. त्यासाठी आम्ही बाहेरील विद्यार्थ्यांना वसतीगृहातून बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. मुलांच्या रास्त असलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यातूनही काही मागण्या राहिल्या असल्यास त्यांनी कळवावे, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे चंद्रकांत डांगे 
यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT