farmer
farmer  
पुणे

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची लवादाकडे धाव

प्रशांत चावरे

भिगवण : खडकवासला धरणातून कालव्याच्या पाण्याचे समन्यायी पध्दतीने वाटप व्हावे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवादाकडे धाव घेतली आहे. लवादापुढे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजु मांडल्यानंतर खडकवासला धरणातुन मागील तीन वर्षामध्ये दौंड व इंदापुर तालुक्याला नेमके किती पाणी वितरीत केले याची माहीती सादर करण्याच्या सुचना प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागास दिल्या आहेत.

ख़़डकवासला प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून दौंड व इंदापुर तालुक्यातील शेतीसाठी पाणी वितरीत करण्यात येते. पुर्वी नियमित होणाऱ्या या पाण्याच्या वितरणांमध्ये मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अनियमितता आली आहे. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी व आंदोलन करुनही न्याय मिळत नसल्यामुळे इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी आदी तलावांमध्ये समन्यायी पध्दतीने पाणी देण्यात यावे अशी मागणी प्राथमिक विवाद निवारण अधिकारी तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांचेकडे याचिका दाखल केली आहे.

शेतकऱ्यांच्या या याचिकेवर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. यावेळी इंदापुर तालुक्यातील गुलाबराव कन्हेकर, शामराव वाघ, प्रकाश ढवळे आदी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजु मांडली. तलावासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत, भादलवाडी, पोंधवडी व मदनवाडी ही गावे खडकवासला लाभक्षेत्रात आहेत गतवर्षी दौंड तालुक्यातील ९० टक्के तलाव भरले असताना इंदापुर तालुक्यातील भादलवाडी, पोंधवडी व मदनवाडी तलाव कोरडे होते. सदर तिन्ही तलाव हे खडकवासला प्रकल्प होण्याअगोदरचे असतानाही प्रकल्पानंतर बांधण्यात आलेले तलाव भरण्यात येतात व आधीच्या तलावांमध्ये मात्र पाणी सोडण्यास टाळाटाळा होते त्यामुळे समन्यायी पध्दतीने या तलावास पाणी वाटप करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पाटबंधारे विभागाच्या वतीने अधिक्षक अभियंता एस.डी.चोपडे, पी.बी. शेलार यांनी बाजु मांडली.

प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजु समजुन घेत मागील तीन वर्षामध्ये ३६ व ४८ वितरिकांच्या माध्यमातून किती पाणी वितरीत करण्यात आले, मागील तीन वर्षामध्ये दौंड तालुक्यातील तलावांना किती पाणी वितरीत करण्यात आले व खडकवासला प्रकल्पाच्या मंजुर आराखड्याची प्रत सादर करावी असे आदेश दिले. याबाबत याचिकाकर्ते गुलाबराव कन्हेरकर म्हणाले, इंदापुर तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलावांमध्ये पाणी न सोडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आधिकाऱ्यंच्या मनमानीपणाला कंटाळुन शेवटी लवादाकडे दाद मागितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT