पुणे

युवकांच्या सहभागातून ग्रामविकास : विश्‍वास नांगरे-पाटील 

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''ग्रामीण महाराष्ट्रात रचनात्मक आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रामपरिवर्तक म्हणून काम करणाऱ्या युवकांचा सहभाग हा बदलांचे संक्रमण घेऊन येईल. बदल घडविण्याचे सामर्थ्य आणि परिस्थितीचा स्वीकार करण्याचे धैर्य हेच महाराष्ट्राच्या ग्रामपरिवर्तनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल,'' असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

यशदा येथे झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलोशिपच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात नांगरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अकरा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक ग्रामपरिवर्तक सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान (एमव्हीएसटीएफ) अंतर्गत हे ग्राम परिवर्तक गावागावांमध्ये जाऊन काम करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त सचिन प्रताप सिंग, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी एम. एस. शेट्टी, निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट, अविनाश धर्माधिकारी, यशदाचे संचालक अजय सावरीकर, रामनाथ सुब्रमण्यम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

नांगरे-पाटील म्हणाले, ''एमव्हीएसटीएफ'मुळे लोकसहभाग आणि खासगी कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नातून शासकीय योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे शक्‍य होणार आहे. गावपातळीवर काम करताना ग्रामस्थांशी संवाद साधून मूळ समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लोकसहभागातून मिळणाऱ्या सकारात्मक पाठिंब्याचा स्वीकार करा, काम करताना निराश होऊ नका. ग्रामपरिवर्तनातूनच समाज बदल घडू शकतो, त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.'' 

या वेळी विविध सादरीकरणे व केस स्टडीजच्या माध्यमातून समस्या, भावी योजना व कामाचे स्वरूप याबाबत या ग्रामपरिवर्तकांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण महाराष्ट्रात काम करताना ग्रामपरिवर्तकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आहेत व संबंधित गावांमधील भावी विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT