Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

पूरग्रस्त २६ कुटुंबांना महापालिकेची घरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरात बेघर झालेल्या आंबिल ओढा भागातील २६ कुटुंबांना महापालिकेच्या ताब्यातील घरे देण्याचा निर्णय स्थायी समितीने बुधवारी घेतला. मात्र, हे पुनर्वसन तात्पुरते राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पुढील चार दिवसांत पूरग्रस्तांना ही घरे मिळण्याचा अंदाज आहे. 

शहरात सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसात आंबिल ओढा परिसरातील २६ घरे पूर्णपणे वाहून गेली, त्यामुळे या कुटुंबांना नव्या पेठेतील महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय रेंगाळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून २६ कुटुंबे शाळेतच राहात आहेत. त्यातच आता शाळाही सुरू झाल्याने पूरग्रस्तांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले.

तरीही पुनर्वसन होत नसल्याने रहिवाशांनी नुकताच महापालिकेवर मोर्चा काढला होता. या पार्श्‍वभूमीवर या लोकांचे पुनर्वसन करण्याची सूचना स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार सध्या महापालिकेकडे असलेल्या मिळकतींमध्ये या लोकांना घरे देण्याची निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया महापालिका प्रशासन करीत आहे; परंतु सध्याची अडचण लक्षात घेऊन २६ कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले. 

सीमाभिंती बांधण्याच्या सूचना
पुराच्या तडाख्यात अनेक सोसायट्यांभोवतीच्या सीमाभिंती पडल्याने त्या बांधण्याची सूचना बांधकाम व्यावसायिकांना करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीने स्पष्ट केले. ज्या ओढे-नाल्यांलगत बांधकामे सुरू आहेत, तेथील बांधकाम व्यावसायिकांकडून ही कामे करून घेण्यात येणार आहेत. पावसामुळे पडलेल्या सीमाभिंती बांधून देण्याची मागणी रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे; परंतु त्यासाठी निधी नसल्याने ही कामे करता येत नाहीत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपत्तीच्या काळात हानी झाल्याने या भिंती बांधण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती. 

स्मारकाच्या भूसंपादनासाठी २० कोटी 
 आद्यक्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या संगमवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भूसंपादनासाठी २० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वर्गीकरणाद्वारे हा निधी दिला असून, या आधी स्मारकासाठी जिल्हा प्रशासनाकडे ३० कोटींचा निधी वर्ग करण्यात आला  आहे. मात्र आणखी निधीची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले. या कामासाठी पुरेसा निधी मिळाल्याने त्याला अपेक्षित गती येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT