माण - राक्षे वस्तीकडुन येणाऱ्या ओढ्यालगत दगड टाकुन प्रवाह वळवण्यात आला आहे.
माण - राक्षे वस्तीकडुन येणाऱ्या ओढ्यालगत दगड टाकुन प्रवाह वळवण्यात आला आहे. 
पुणे

नैसर्गिक जलस्रोत धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - हिंजवडी, माण, मारुंजी भागात आयटी क्षेत्र व नागरीकरणाच्या विस्तारामुळे येथील ओढ्या-नाल्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. एकीकडे उद्योगनगरीचा परिसर सुधारताना दिसत आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक जलस्रोतांवर घाव घालत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी परंपरागत असलेले ओढेनाले बुजविले जात आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांचा मार्ग बदलला जात आहे. तर काही चक्क ओढे गायब केल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही, तर कात्रज-शिंदेवाडीसारखी दुर्घटना घडल्याला वेळ लागणार नाही.

नैसर्गिक जलस्रोत वळविल्याने गेल्या आठवड्यात माणच्या मुख्य रस्त्यावरच जलाशयाची भीषण घटना घडली होती. या घटनेतही ठोस कारवाई करण्याऐवजी जुजबी मलमपट्टी करण्याचे काम महसूल प्रशासनाने केले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मोऱ्या बुजवित असल्याचे पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे अद्याप उघडले नाहीत.

हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे परिसरातील रस्ते नव्याने तयार झाल्याने दर आठवड्याला शेकडो व्यावसायिकांनी गाळे, दुकाने थाटली आहेत. त्यामुळे जलस्रोत रस्त्यांलगतची गटारे, कॅनॉल व्यावसायिक कारणांसाठी बुजविले जात आहेत. त्या वेळी संबंधित विभागातील अधिकारी बघ्याची भूमिका घेताना घेत असल्याचा आरोप हिंजवडीचे ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे यांनी केला आहे. या भागातील अनेक ओढे-नाले नामशेष झाले आहेत. 

काही होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गसौंदर्य लाभलेल्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक जलस्रोत वळविण्याचा व प्लॉट विकासासाठी ओढे-नाले बुजविण्याचा घाट येथील धनदांडग्यांकडून घातला जात आहे. माणच्या येथील बोडकेवाडीहून हिंजवडीच्या शिवेवर आलेल्या ओढ्यावर दगड, मुरूम टाकून तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ओढ्यातून कंपन्यांच्या सांडपाणी नदीला सोडतात. 

अनेक हॉटेल व्यावसायिकांचे खरकटे अन्न व राडारोडा ओढ्यातच फेकून दिला जातो. राक्षेवस्तीवरून आलेला पूर्वीचा ओढाच गायब केला आहे. या ओढ्याचे पाणी भात खाचरांतून आणून सोडले आहे.

बांधकामे परवाने देताना पीएमआरडीए व एमआयडीसीने महसूल विभागाचाही अभिप्राय घेतला पाहिजे. गौण खनिजांचा किती परवाना आणि किती उत्खनन होते, याचे मोजमाप होत नाही. जर कुणी ओढ्या-नाल्यांमध्ये दगड मुरूम आणून भराव करीत असेल, नैसर्गिक प्रवाह वळवत असेल तर संबंधित जागामालकांच्या सातबारावर दंड आकारण्यात येणार आहे.
- अभय चव्हाण, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT