खडकवासला : "वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक आपत्ती वाढण्याचा धोका असतो. याच्या उपाययोजनांबाबत ठोस निष्कर्ष अद्याप झालेला नसला तरी, त्याच्यावर अभ्यास मात्र सुरू आहे. या बदलांमुळे समुद्राची पातळी मोठ्या प्रमानात वाढत आहे. त्याच्यावर देखील काम सुरू आहे. त्याचा नियमित अभ्यास झाला पाहिजे. समुद्र वाढल्यामुळे बंदर पोर्ट याच्या डिझाईनवर काय परिणाम होतो. त्याच्यावर देखील आम्ही सखोल अभ्यास करीत आहोत." अशी माहिती केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष एस मसूद हुसेन यांनी दिली.
खडकवासला येथील केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्राच्यावतीने केंद्रीय जल संसाधन मंत्रालय, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन मंत्रालय भारतीय जलविज्ञान संस्था यांच्या माध्यमातून समुद्र किनारपट्टी, बंदरे, समुद्री अभियांत्रिकी यावर सहावी राष्ट्रीय परिषद खडकवासला येथे आयोजित केली आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त सचिव टी राजेश्वरी, केंद्राचे माजी संचालक झेड. एस. तारापोर, जेएनपीटीचे सल्लागार राजू सिन्हा, मुंबई आयआयटीचे प्रा. एम.सी. देव सीडब्ल्यूपीआरएसचे शास्त्रज्ञ टी नागेंद्र, डॉ. प्रभात चंद्र, शास्त्रज्ञ महेंद्र पवार यावेळी उपस्थित होते. या परिषदेत सुनामी, पूर अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आधुनिक पध्दतीने मांडणी, व्यवस्थापन यावर कॉरपोरेट अभियांत्रिकी आणि पोर्ट डेव्हलपमेंटच्या डिझाइन, नियोजन, बांधकाम, देखभाल आणि संशोधन पैलूमध्ये काम करणारे अभियंते, शास्त्रज्ञांना एकत्र आणून त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण असे सांगून हुसेन म्हणाले, "देशाच्या 7हजार500 किलोमीटरचा किनारा आहे. त्यावर प्रामुख्याने अभ्यास सुरू आहे. परिषदेत संशोधन व निष्कर्षवर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणाऱ्या व्यक्तींमध्ये मांडणार आहे."
सागरी अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) विकसित करून देशाचा विकास करणार : नितीन गडकरी
समुद्र किनारपट्टी, बंदर व समुद्री अभियांत्रिकी या विषयावर अधिक संशोधनाची गरज आहे. पुण्यातील केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेने समुद्रसंबंधी विषयावरील दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. आता आम्ही सागरी अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) विकसित करीत आहोत. त्याचा आंतरराष्ट्रीय मानके व निकषानुसार आम्ही देशाचा विकास करणार आहोत. याच बरोबर यामधील संशोधन, निष्कर्ष हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. या उपक्रमामुळे आपल्या देशासाठी होणारे नवीन संशोधन देखील आमच्यासाठी उपयुक्त आहेत. या राष्ट्रीय परिषदेतील विचारांच्या देवाण घेवाणीमुळे नवीन दृष्टिकोन मिळतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज वाहतूक व जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.