PM_Narendra_Modi
PM_Narendra_Modi 
पुणे

...म्हणून पंतप्रधानांना देशभरातून केले जाणार १ लाख फोन; काय आहे 'हे' प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकरी आणि कामगारांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक लाख फोन करणार असल्याचे किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. १० ऑगस्ट रोजी राज्यासह देशभरातून हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील नागरिकांसह कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी कोरोनावरील लस आणि औषधासंदर्भात जनतेसमोर भूमिका मांडावी, राष्ट्रीय भावना वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सात मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवली असून, त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने आम्ही देशभरातून एक लाख लोक फोन करून आंदोलन करणार आहोत. विविध संस्था आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. 

किसान आर्मीच्या पंतप्रधानांकडे या मागण्या : 
- शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करावे. 
- पंतप्रधानांनी कोरोनावरील औषध आणि निवारण कार्यक्रम जनतेसमोर जाहीर करावा. 
- सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन सैन्याला मानवंदना द्यावी. 
- कोरोनातून बरे होणाऱ्यांना नेमकी कोणती औषधे दिली. हे लोकांना सांगावे. 
- प्रत्येक राज्यात विरोधी पक्ष मदत व सल्लागार समिती स्थापन करावी. 
- राज्यपालांनी जनतेसाठी काय केले याचा अहवाल प्रत्येक राज्याने द्यावा. 
- कोरोना विरुद्ध लढणारे आरोग्य कर्मचारी, पोलिस आदींना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व विशेष साहाय्य द्यावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

SCROLL FOR NEXT