PM_Narendra_Modi 
पुणे

...म्हणून पंतप्रधानांना देशभरातून केले जाणार १ लाख फोन; काय आहे 'हे' प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकरी आणि कामगारांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात एक लाख फोन करणार असल्याचे किसान आर्मी आणि वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. १० ऑगस्ट रोजी राज्यासह देशभरातून हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील नागरिकांसह कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी कोरोनावरील लस आणि औषधासंदर्भात जनतेसमोर भूमिका मांडावी, राष्ट्रीय भावना वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत आदी सात मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधी पंतप्रधान कार्यालयात तक्रार नोंदवली असून, त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने आम्ही देशभरातून एक लाख लोक फोन करून आंदोलन करणार आहोत. विविध संस्था आणि नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे. 

किसान आर्मीच्या पंतप्रधानांकडे या मागण्या : 
- शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांच्या खात्यावर थेट १५ हजार जमा करावे. 
- पंतप्रधानांनी कोरोनावरील औषध आणि निवारण कार्यक्रम जनतेसमोर जाहीर करावा. 
- सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन सैन्याला मानवंदना द्यावी. 
- कोरोनातून बरे होणाऱ्यांना नेमकी कोणती औषधे दिली. हे लोकांना सांगावे. 
- प्रत्येक राज्यात विरोधी पक्ष मदत व सल्लागार समिती स्थापन करावी. 
- राज्यपालांनी जनतेसाठी काय केले याचा अहवाल प्रत्येक राज्याने द्यावा. 
- कोरोना विरुद्ध लढणारे आरोग्य कर्मचारी, पोलिस आदींना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा व विशेष साहाय्य द्यावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

Talegaon Abuse Case : बांगलादेशी अल्पवयीन मुलीवर डांबून ठेवत अत्याचार ; तळेगाव एमआयडीसी पोलीसांकडून एकास अटक!

AUS vs IND, 4Th T20I: अर्शदीपने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून कॅच घेतला अन मॅच भारताकडे फिरली; पाहा टर्निंग पाँइंट ठरलेला क्षण

SCROLL FOR NEXT