बालगंधर्व रंगमंदिर - विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांच्याशी संवाद साधताना मुलाखतकार सुधीर गाडगीळ.
बालगंधर्व रंगमंदिर - विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांच्याशी संवाद साधताना मुलाखतकार सुधीर गाडगीळ. 
पुणे

समाजकार्याचे बाळकडूही आईकडूनच - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘चांगल्या संस्कारांबरोबरच समाजकार्याचे बाळकडूही आईने मला दिले. ही आमच्या कुटुंबातील संस्कृतीच आहे. आयुष्यात संगत कोणाची असावी याचे संचित देताना प्रत्येक गोष्टीमागे कुणाचे तरी कष्ट असतात, याची शिकवणही तिच्याकडूनच मिळाली आहे, त्यामुळे आजही प्रत्येक दिवसाच्या शेवटी दुसऱ्यांसाठी काय केले, याचा विचार नियमितपणे करतो, अशी भावना विद्यार्थी सहायक समिती आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी सहायक समिती, माजी विद्यार्थी मंडळ यांनी प्रतापराव पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत अनुभव’ या कृतज्ञता समारंभाचे आयोजन केले होते, यानिमित्ताने पवार यांच्या आयुष्याचा पट नागरिकांसमोर आला. त्यांच्या पत्नी भारती पवार यांनी समितीच्या वतीने पवार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी पवार यांचे मित्र, कुटुंबीय, सामाजिक संस्थांमधील सहकारी यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकात तुकाराम गायकवाड यांनी समितीचे कार्य आणि त्यात पवार यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. 

संवादक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू समोर आणले. सामाजिक कामांशी कसे जोडले गेलात, या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ‘‘आमच्या घरात धार्मिक अवडंबर नाही, हा आई-वडिलांचा संस्कार आहे. तरीही एकदा मी आईला विचारले, की श्रद्धा कशावर ठेवू? तेव्हा ती म्हणाली होती, की सत्कर्म आणि सामाजिक कामावर श्रद्धा ठेव. तिच्या विचारांची हीच शिदोरी या कामांसाठी प्रोत्साहन देत आहे.’’ 

‘अंधशाळेच्या कामामुळे नरूभाऊ लिमये आणि अनंतराव पाटील यांच्यासारखी माणसे जवळ आली. अच्युतराव आपटे यांच्यामुळे विद्यार्थी सहायक समितीकडे ओढला गेलो. त्यांच्या आग्रहामुळेच समितीचे विश्‍वस्तपद स्वीकारले. या संस्थांबरोबर बालग्राम, स्वरूपवर्धिनी अशा अनेक संस्थांसाठी निरपेक्ष वृत्तीने काम करणारी अनेक माणसे मला आयुष्यात भेटली, त्यांच्यामुळे निस्पृहपणे काम करण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत,’’ अशा शब्दांत पवार यांनी त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला.

व्यवसायातील पदार्पणाबद्दल ते म्हणाले, ‘‘शिक्षणानंतर मदत मागण्यासाठी घरी परतायचे नाही, असा आईचा दंडक होता. शिक्षण घेत असतानाच कुटुंबाची व्यावसायिक पार्श्‍वभूमी असलेल्या मित्रांकडून उद्योगाचे तंत्र शिकून घेतले. त्या वेळी ‘विशाल सह्याद्री’ हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत होते, त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी तेथील जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. त्या वेळी वृत्तपत्र चालविण्याचा कोणताही अनुभव नव्हता; परंतु इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर हे वृत्तपत्र अडचणीतून बाहेर काढले. ‘सकाळ’ चालविण्यासाठी हीच रंगीत तालीम उपयुक्त ठरली होती.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT