pune
pune 
पुणे

पुण्यात ५० पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड, पर्वती परिसरातील घटना

सकाळ डिजिटल टीम

३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. आताही पुण्यातून अशीच एक बातमी समोर येत आहे. पुण्यात ५० पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींमधून ही धक्कादायक माहिती मिळत आहे. ३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेली माहिती अशी की, पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र असून दिवसेंदिवस टोळक्यांचा धुडगूस वाढला आहे. दरम्यान, शहरातील पर्वती पायथा येथील जनता वसाहत येथे ५० हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. साधारणत: ३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. काल रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत चारचाकी, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरातही असाच प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडल्याने नागरिक भयभित झाले आहेत. हा हल्ला नेमका कुणी केला अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्याल आली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. याआधीही पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेची दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्ररा दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Chabahar Port: चीनच्या पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला भारताचे 'चाबहार'ने प्रत्युत्तर; इराणसोबत ऐतिहासिक करार

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

SCROLL FOR NEXT