Sinhgad Road
Sinhgad Road Sakal
पुणे

Sinhgad Road : टेकड्या पोखरल्यामुळे उद्ध्वस्त होत असल्याचे रस्त्यावरील विदारक चित्र

योगिराज प्रभुणे

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील टेकड्यांचे महत्त्व अचूक ओळखले होते. सिंहगडाच्या संरक्षणात नऱ्हे आणि धायरीच्या टेकड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यातील टेकड्यांचे महत्त्व अचूक ओळखले होते. सिंहगडाच्या संरक्षणात नऱ्हे आणि धायरीच्या टेकड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आक्रमण करणाऱ्या सैन्याला रोखण्यासाठी या टेकड्यांची मदत झाली. मराठा साम्राज्याचे संरक्षण करणाऱ्या याच टेकड्या पोखरल्यामुळे उद्ध्वस्त होत असल्याचे विदारक चित्र सिंहगड रस्त्यावर दिसते.

पर्यावरणीय महत्त्व

- फक्त याच स्थानिक प्रदेशात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती आणि किटक येथे आहेत. त्यामुळे या दोन्ही टेकड्यांचे पर्यावरणीय महत्त्व अनन्यसाधारण आहे.

- पावसाळ्यात या टेकड्यांवरून पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वाहतात. परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या-नाल्यांना हे जलस्रोत आहेत.

- मृद संवर्धन, मातीची धूप आणि भूस्खलन रोखण्यात टेकड्यांची भूमिका महत्त्वाची असते. टेकड्यांवरील झाडे आणि विविध वनस्पतींचे मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवण्यात मदत करतात.

- हरित वायूंचा प्रभाव कमी करण्यात टेकड्यांवरील झाडे उपयुक्त ठरतात. जमिनीवर बांधकामांमुळे वृक्षतोड झाली आहे. त्या तुलनेत टेकड्यांवर काही प्रमाणात झाडे शिल्लक आहेत. त्यांच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतला जातो.

वैशिष्ट्य काय आहेत?

- वनस्पती : दुर्मिळ औषधी वनस्पती, झुडपे आणि झाडे यांचा समावेश असलेल्या वनस्पतींच्या विविध दुर्मिळ प्रजाती या टेकड्यांवर आहेत. साग, जांभुळ, वड, पिंपळ, आंबा ही झाडे मोठ्या प्रमाणात होती.

- पक्षी : या टेकड्या पक्षीप्रेमींसाठी नंदनवन होत्या. या भागात दोनशेहून अधिक पक्षांच्या प्रजातींची नोंद आहे. विशेषतः टेकड्यांवर आढळणारे पक्षी येथे दिसतात. पण, हे प्रमाण आता कमी होत असल्याची माहिती पक्षीनिरीक्षक सागर धुमाळ यांनी दिली.

- प्राणी : या भागात पूर्वी कोल्हे आणि लांडगे दिसत. पण, आता जंगल कमी झाले. लोकसंख्या वाढली, बांधकामे झाले त्यामुळे या प्राण्यांचे स्थलांतर झाले, अशी माहिती पर्यावरणीय अभ्यासक केदार साळुंखे यांनी दिली.

- सरपटणारे प्राणी : टेकड्या हे साप, सरडा अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचे घर असते. त्यामुळे त्यांचे दुर्मिळ प्रजातीही येथे आढळतात.

कुठे आहेत टेकड्या?

नऱ्हे आणि धायरीच्या टेकड्या सिंहगडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला येतात. जवळ-जवळ असलेल्या या दोन स्वतंत्र टेकड्या आहेत. नऱ्हे ही पुण्याच्या नैऋत्य दिशेला असून, त्याची उंची समुद्रसपाटीपासून २०० मीटर आहे. धायरीतील टेकड्या या नऱ्हेच्या आग्नेयेस आहेत. समुद्रसपाटीपासून २५० मीटर उंच आहेत.

टेकड्यांचा इतिहास

  • ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाखो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या टेकड्यांना देदीप्यमान इतिहास.

  • या टेकड्यांच्या जवळच मराठी साम्राज्यातील सिंहगड हा सर्वांत महत्त्वाचा किल्ला आहे.

  • या किल्ल्याच्या संरक्षणासाठी या परिसरातील टेकड्यांचे व्यूहरचनात्मक महत्त्व होते. त्यापैकी या दोन टेकड्या आहेत.

  • धायरीतील खंडोबा डोंगरावर शिवकालीन पाण्याचे टाके होते.

  • मराठी सैन्य येथून या प्रदेशाची टेहेळणी करत असे.

  • इंग्रज राजवटीत हा प्रदेश बॉम्बे प्रेसिडेंन्सीच्या अखत्यारित होता. याच काळात टेकड्यांच्या भोवती पूल उभारण्यात आले.

  • स्वातंत्र्योत्तर काळात निसर्गातील महत्त्वाचा घटक म्हणून याचे संवर्धन करण्यात आले.

सद्यःस्थिती काय आहे?

  • बेकायदा वृक्षतोड या टेकड्यांवर सुरू आहे.

  • अनधिकृत बांधकामांनी टेकड्या गिळंकृत केल्या.

  • शहर विस्ताराच्या बेफाम वेगाच्या रेट्यामुळे टेकड्या फोडून घरे बांधण्यात येत आहेत.

  • व्यावसायिक वापरासाठी टेकड्यांचा वापर सर्रास सुरू आहे.

  • या परिसरात वाहनांच्या वर्दळीमुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहे.

  • धुळीचे प्रमाण प्रचंड असल्याने हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचे दिसते.

  • जैवविविधता वेगाने नष्ट होत आहे.

निसर्गाची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे. या परिसरात असणारी जैवविविधता जपणे हीच आपली मानवता असेल. मनुष्याकडून कुठल्या प्रकारची नैसर्गिक हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे.

- चंद्रशेखर पोकळे, सिंहगड ट्रेकर्स ग्रुप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT