पुणे

‘सकाळ रिलीफ फंडा’ला यंदाचा ‘कारगिल गौरव’ पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कारगिल युद्ध असो की जम्मू-काश्‍मीरमधील पूरस्थिती, अशा अनेक आपत्तींच्या काळात या राज्याला मदत करणाऱ्या ‘सकाळ रिलीफ फंडा’ला यंदाचा ‘कारगिल गौरव’ पुरस्कार जाहीर झाला. याबरोबरच दशरथ जाधव, काचो अहमद खान आणि पत्रकार राखी बक्षी यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘सरहद’ संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लष्कराच्या उत्तर मुख्यालयाचे माजी प्रमुख आणि सर्जिकल स्टाइकचे नेतृत्व केलेले लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा, अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक राकेश भान यांच्या उपस्थितीत २३ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार प्रदान केले जातील. 

निवृत्त लेफ्टनंट जनरल मोती धर आणि रवी दास्ताने यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे ‘सरहद’चे संजय नहार आणि संजीव शहा यांनी सांगितले. ग्रामीण भागात जनावरांना चारावाटप आणि पाणीपुरवठा या समाजकार्यासाठी, खान यांनी काश्‍मिरात पारंपरिक सौरऊर्जेसाठी केलेले उल्लेखनीय कार्य आणि बक्षी यांनी पत्रकारिता क्षेत्राला दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात येत आहे. या कार्यक्रमात कारगिलवर देशात प्रथमच तयार केलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करणार असल्याचे शहा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT