sharad pawar
sharad pawar  
पुणे

महात्मा फुलेंना अभिप्रेत असणारा विज्ञानवादी दृष्टिकोन हवा: पवार

पांडुरंग सरोदे

पुणे  -  "महात्मा फुले यांनी समाजाचा प्रचंड विरोध असताना, रुढ़ी-परंपराचा पगडा असतानाच्या काळात आधुनिक व विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवला. परदेशातील आधुनिक विज्ञानाचा वापर करुन कृषी, शिक्षण, स्त्री शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांना अभिप्रेत असणारा हाच विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवल्यास राज्याची व देशाची प्रगती होईल." असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भुमी येथे "महात्मा फुले समता पुरस्कार वितरण" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेन्द्र कुशवाहा, परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, खासदार पंकज भुजबळ, राजस्थान येथील मोतीलाल सांकला, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ.मा.गो.माळी यांना "महात्मा फुले समता पुरस्कार" प्रदान करण्यात आले. पवार म्हणाले, "कृषी उत्पादन वाढविण्यासाठी संकरीत वाण निर्माण केले पाहिजे, याचा आग्रह पहिल्यादा फुले यांनी धरला. म्हणुनच फुले हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते ठरतात. गायकवाड वाडयाचा आणि त्यांचा संघर्ष असतानाच्या काळात आणि प्रचंड विरोध असतानाही त्यांनी फिकिर केली नाही. याउलट संपूर्ण आयुष्य त्यांनी आधुनिक विज्ञानाला प्राधान्य दिले. विकासाच्या विचारातुनच त्यांनी समाजकारण केले. त्यांचे कार्य पुढे न्यायचे असेल तर शेतकरयांचा संसार टिकला पाहिजे. शिक्षणाचा आणि स्त्री शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार झाला पाहिजे."

छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना पवार म्हणाले, "भुजबळ यांनी केलेल्या संघर्षातुनच महात्मा फुले वाडा आणि परीसराचा विकास झाला आहे. महात्मा फुले वाडयाचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर व्हावे, यासाठीही त्यांनीच मोठे काम केले. मी मुख्यमंत्री असताना फुले यांचे समग्र वाङमय 15 भाषांमध्ये भाषांतरीत केले. त्यामुळे फुले यांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला."

पुरस्कारार्थी डॉ.माळी यांच्याविषयी पवार म्हणाले, "महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे बीज समाजात रुजविले. त्याच धर्तीवर डॉ.माळी यांनी ग्रामीण भागातील शिक्षणावर दिला. ऊस कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलासाठी त्यांच्या प्रयत्नांतून साखर शाळा निर्माण झाल्या. शालेपासुन असलेल्या घटकांना त्यांनी शालेचा मार्ग दाखविला. सावित्रीबाई  फुले यांच्या जीवनावर संशोधनही केले."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT