shivajirao-adhalrao-patil
shivajirao-adhalrao-patil 
पुणे

चेहरा कुणाचा काळवंडला, हे जनता सांगेल - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा

शिरूर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुठलेही वक्तव्य राज्यातील जनता गांभीर्याने घेत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही या वाचाळवीराची बडबड राष्ट्रवादी काँग्रेस कशी काय सहन करते, असा सवाल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. 

माझ्या पक्षाचे १८ खासदार आलेत आणि तुमच्या पक्षाचे केवळ चार, त्यात तुमच्या मुलाचा दारुण पराभव झाल्याने चेहरा कुणाचा काळवंडला हे जनता सांगेल, असा टोला त्यांनी लगावला. शिरूर लोकसभेतील पराभवाने आढळराव यांचा चेहरा काळवंडला, बाबाच्या डोक्‍यात हवा गेली होती, असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते, त्याला आढळराव यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. 

ते म्हणाले, ‘‘ज्या मतदारसंघातून मुलाचा पराभव झाला, त्याच मतदारसंघातील सभेत माझा चेहरा काळवंडला म्हणणाऱ्या अजित पवारांना नैतिकता उरलेली नाही. मुलाला निवडून आणता येत नाही, अशा माणसाने माझ्यावर बोलणे हा विनोद आहे. माझे चुलते कधी केंद्रात मोठे मंत्री किंवा मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे माझ्या पराभवाचे फारसे दुःख नाही. कारण, मला पदापेक्षा लोकांचा संपर्क, सहभाग महत्त्वाचा आहे.’’

‘‘शरद पवार यांचा पार्थला उभे करण्यास विरोध होता. मात्र, त्यांनी साहेबांनाही अव्हेरले. दहा- बारा वर्षांत पक्षाचे वाटोळे करायला तेच कारणीभूत आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षांतर्गत स्वतःचा गट तयार करून साहेबांच्या इच्छेविरुद्ध मुख्यमंत्री होण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; परंतु त्यांची मस्ती त्यांच्याच नेत्यांनी जिरवली. त्यामुळे त्यांनी माझ्याबाबतीत बोलताना दहा वेळा विचार करावा,’’ असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT